शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

हक्कभंग प्रस्ताव आणणार

By admin | Published: March 21, 2016 2:47 AM

राज्य सरकारने आॅक्टोबर २०१५ मध्ये राज्यातील १४,७०८ गावांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली होती. यातून

नागपूर : राज्य सरकारने आॅक्टोबर २०१५ मध्ये राज्यातील १४,७०८ गावांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली होती. यातून विदर्भाच्या नागपूर विभागातील ७६०० तर अमरावती विभागातील ४७२७ गावांची पैसेवारी ५०टक्केपेक्षा कमी असून वगळण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात गंभीर नसल्याने आज सोमवारी विरोधी पक्षातर्फे विधिमंडळात हक्कभंग, स्थगन प्रस्ताव आणणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी परिस्थितीबाबतच्या अहवालात शेतकऱ्यांविषयी अनास्था असल्याने स्पष्ट झाले आहे. ५० टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. देवानंद पवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अमरावती विभागातील ४७२७ गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश दिले. याप्रमाणे पूर्व विदर्भातील ७६०० गावांचाही यादीत समावेश व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या वर्षभरात राज्यातील तीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कोणत्याही स्वरूपाच्या ठोस उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत. उलट ५० टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांचा यादीत समावेश न करता सरकारने ७५ टक्केपेक्षा कमी पाऊ स असलेल्या गावांचा समावेश करण्याचा अफलातून निर्णय घेतला. भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाहीएमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी भारत मात की जय म्हटले नाही. म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले. या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी सभागृहातील परिस्थितीनुरूप निर्णय घेतला असेल. मात्र आम्हाला योग्य वाटत असेल तेच इतरांनी बोलावे. ही त्यांची भूमिका चुकीची आहे. देशभक्तीसाठी भाजप-शिवसेनेच्या प्रमाणपत्राची कुणाला गरज नसल्याचे चव्हाण यांनी प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.उर्दू साहित्यिक देशद्रोही कसे?केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शासनाचे अनुदान घेणाऱ्या उर्दू साहित्यिकांना सरकार विरोधात लिखाण करता येणार नाही, असा संदर्भात फतवा काढला आहे. एखाद्या साहित्यिकाने सरकार विरोधात लिखाण केले म्हणजे तो देशद्रोही आहे का, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे. देशातील सर्वच उर्दू साहित्यिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.