शहरं
Join us  
Trending Stories
1
हाथरस दुर्घटना : मृतदेह बघून हृदयविकाराचा झटका, कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू
2
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले; CM शिंदेंनी बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय
3
"देशाने 1 जुलैला 'खटाखट दिवस' साजरा केला, लोक बँक खाते चेक करत होते...", PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार निशाणा
4
IB मध्ये नोकरी, आता धार्मिक सत्संग; कोण आहेत भोले बाबा? ज्यांच्या कार्यक्रमात झाली चेंगराचेंगरी
5
पिंपरी जलसेनची जिल्हा परिषद शाळा खासगी शाळेवर भारी, २२ गावांतून येतात विद्यार्थी
6
चक्रीवादळात अडकलेल्या टीम इंडियाचा मार्ग मोकळा; या तारखेला मायदेशी परतणार सर्व खेळाडू
7
"ही आता परजीवी काँग्रेस; ज्याच्यासोबत असते त्यालाच...", पंतप्रधान मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी
8
“ऋण काढून सण करायला लावणारा अतिरिक्त अर्थसंकल्प”; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका
9
Pune :पुणे सोलापूर हायवेवर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू
10
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
11
हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा   
12
"हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?
13
"आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है...", निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
15
"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन
16
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
17
"मतदारांनी काँग्रेसलाही जनादेश दिला, तो विरोधी बाकावर बसण्याचा", PM मोदींची बोचरी टीका...
18
“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी
19
"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'या' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा होणार खास सन्मान

नेते कार्यक्रमाला येत नाहीत... मग आम्हीच मंचावरील अतिथी; नाथजोगी समाजाचा आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 9:36 PM

Nagpur News नाथजोगी समाजमेळाव्यास भाजपचा एकही नेता न आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी गोंधळ घातला.

ठळक मुद्दे मेळाव्याला भाजपचा एकही नेता न आल्याने संताप, सुरेश भट सभागृहात तणाव

नागपूर : राजकीय नेत्यांना एखाद्या कार्यक्रमाला बोलविणे ही तशी तारेवरची कसरतच असते. काही राजकीय नेते आश्वासन देऊनही कार्यक्रमाला येत नाहीत आणि आयोजक मनातल्या मनात चरफडत वेळ टाळून नेतात. मात्र, शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या नाथजोगी समाजाने गुरुवारी नागपुरात अशा राजकीय नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम केले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एकही नेता न आल्याने उपस्थित व आयोजकांच्या संयमाचा बांध सुटला. सार्वजनिकपणे याविषयी संताप व्यक्त तर झालाच, मात्र त्याहून पुढे जात काहींनी थेट मंचावर धाव घेतली. नेते येत नाहीत तर आपणच मंचावरील अतिथी असे म्हणत जोपर्यंत पाहुणे येणार नाहीत तोपर्यंत सभागृह सोडणारच नाही, अशी भूमिका घेतली.

नाथजोगी समाजातर्फे कविवर्य सुरेश भट सभागृहात समाजबांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना निमंत्रित करण्यात आले होते. या नेत्यांनी समाजातील पदाधिकाऱ्यांना होकारदेखील दिला होता. या कार्यक्रमाची वेळ १२ वाजताची होती. मात्र, दोन वाजेपर्यंत एकही अतिथी पोहोचले नाहीत. यामुळे उपस्थितांसह आयोजकदेखील संतप्त झाले. महाराष्ट्र नाथजोगी समाजाचे अध्यक्ष दशरथ सावंत (पांडे महाराज) हे मंचावर पोहोचले व तेथूनच त्यांनी नेत्यांविरोधात आक्रमक भाषण सुरू केले. यानंतर समोरील अनेकजण मंचावर पोहोचले व अतिथींच्या खुर्च्यांवर जाऊन बसले. त्यांच्यातील लोकांनीच भाषणे देण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे दुपारपर्यंत सभागृह परिसरात तणावाचे वातावरण होते. महाराष्ट्रातील विविध भागातून लोक या मेळाव्याला आले होते व अनेकांनी निषेध म्हणून सायंकाळपर्यंत जेवणदेखील केले नाही.

गडकरींनी अगोदर फोन व नंतर प्रत्यक्ष साधला संवाद

सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोक सभागृहात होते. नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच स्पीकर फोनच्या माध्यमातून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. हा प्रकार कळल्यावर त्यांनी शिष्टमंडळाला बोलावून घेतले व त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

स्थानिक नेत्यांवर जास्त संताप

समाजाचे अध्यक्ष दशरथ सावंत (पांडे महाराज) यांनी सर्वांच्या संतापाचे कारण सांगितले. नितीन गडकरी प्रकृती ठीक नसतानादेखील आम्हाला भेटले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत बैठका असल्याने येऊ शकले नाहीत. मंत्र्यांचे आम्ही समजू शकतो. मात्र, नागपूर जिल्ह्यातील भाजपचा एकही आमदार कार्यक्रमाला फिरकला नाही ही गोष्ट निश्चितच दुखावणारी होती. गडकरींनी स्वत:हून फोन करून प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. मात्र, इतर नेत्यांचीही प्रकृती खराब झाली होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Socialसामाजिक