शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

नागपूर-झारसुगुडा-बिलासपूर सेक्शनमध्ये मिळणार रेल्वेला 'कवच'

By नरेश डोंगरे | Published: June 25, 2024 11:48 PM

lokmat Impact: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून तयारी, दिल्ली रेल्वे बोर्डाकडे गेला प्रस्ताव

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वे गाड्याच नव्हे तर प्रवाशांच्याही जिवाला धोका होणार नाही, रेल्वेचा अपघात होणार नाही, यासाठी स्वयंचलितपणे काम करणारे 'कवच' लवकरच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या क्षेत्रात लावले जाणार आहे. तशा संबंधिची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली आहे.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, १७ जूनला पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. १० जणांचा जागीच जीव गेला होता तर पन्नासावर प्रवाशांना गंभीर दुखापत झाली होती. १८ जूनला लोकमतने 'अपघात रोखणारी कवच सिस्टम थंडबस्त्यात' अशा आशयाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. त्याची नागपूर ते दिल्ली सर्वत्र जोरदार चर्चा झाली. रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत नागपूरसह ठिकठिकाणच्या रेल्वे मार्गावर आणि गाड्यांमध्ये 'कवच सिस्टम' लावण्यासंबंधाने हालचाली सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-झारसुगुडा-बिलासपूर-रायपूर मार्गावर आणि रेल्वे गाड्यात तातडीने कवच सिस्टम लावण्यात यावी, असा प्रस्ताव दिल्लीला रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला. त्याला मंजूरी मिळताच कवच सिस्टम संबंधाने काम सुरू करण्यात येणार आहे.

असे आहे 'कवच'

दोन गाड्या एकाच ट्रॅकवर धावत असेल आणि लोको पायलटने वेळीच त्या सुरक्षित अंतरावर थांबवल्या नाही तर त्या एकमेकांना धडक देऊन मोठा अपघात घडतो. मात्र, तर 'कवच' सिस्टम कार्यान्वित केली असेल तर अतिउच्च रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे याच नव्हे तर ५ किलोमीटरच्या परिसरात वेगवेगळ्या रुटवर धावणाऱ्या गाड्यांचेही संरक्षण होते. चुकून कोणती ट्रेन रेड सिग्नल असतानाही धावत असेल तर त्या आणि त्या रुटवर धावणाऱ्या सर्व गाड्यांच्या लोको पायलटला, आजुबाजुच्या स्टेशन मास्टरला धोक्याची सूचना मिळते. एवढेच नव्हे तर पाच किलोमिटर परिसरातील सर्वच्या सर्व रेल्वेगाड्यांचे इंजिन काही वेळेसाठी आपोआप बंद पडते विशेष असे की, हे बहुगूणी 'कवच' पुर्णत: भारतीय बनावटीचे आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे