शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

तलावात पोहण्याच्या नादात जीव गमावला; बुटीबोरीच्या तरुणाचा मकरधोकडात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 12:31 IST

क्षणभरातच आदित्य तलावाच्या पाण्यात दिसेनासा झाला

उमरेड (नागपूर) : तालुक्यातील मकरधोकडा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. आदित्य उमाशंकर शर्मा (१८, रा. सिर्सीनगर, बुटीबोरी), असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (दि.१३) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.

गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास दोन वेगवेगळ्या दुचाकीने चार मित्र मकरधोकडा तलावाच्या दिशेने आले. मृत आदित्य शर्मा याच्यासोबत बुटीबोरी येथील हिमांशू यादव, सुमित सोनटक्के आणि अनीश कौशद हे तिघे होते. काही वेळ चौघांनीही आनंद साजरा केला. तलावाच्या किनाऱ्यालगत असलेल्या पाइपलाइनवर चौघेही बसले.

काही वेळातच आदित्य तलावात पोहण्यासाठी गेला. यातच तो खोल खड्डा असलेल्या पाण्यात गेला. मित्रांनी आदित्यला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तत्पूर्वी, क्षणभरातच आदित्य तलावाच्या पाण्यात दिसेनासा झाला. तलावाच्या काही अंतरावरच मोठ्या खड्ड्याचे खोदकाम केले गेले आहे. यामुळे हा परिसर धोकादायक आहे. आदित्यचा शोध घेण्यासाठी मकरधोकडा येथील नागरिकांनी बरेच प्रयत्न केले. अखेर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आदित्यचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी दिली.

मोह आवरा, जीव वाचवा

पावसाळ्यात मकरधोकडा जलाशयाकडे हजारो पर्यटक हजेरी लावतात. धबधबा सुरू झाला की, या परिसरात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर उसळते. दररोज दोन- चार हजार पर्यटक हजेरी लावतात. शेकडो वाहनांच्या रांगा परिसरात दिसून येतात. सध्या पावसाअभावी जलाशयात पाणीसाठा कमी आहे. असे असले तरीही या तलाव परिसरातील हिरवळ, धबधब्यासमोरील काळ्या दगडांचे सौंदर्य पर्यटकांना खुणावते. पर्यटकांनी या परिसरात आनंद साजरा करीत असताना पोहण्याचा मोह आवरावा, असे आवाहन पुरुषाेत्तम बोबडे यांनी केले आहे.

यापूर्वीही याच परिसरात अंघाेळ करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा जीव गेला होता. पर्यटकांनी काळजीपूर्वक यावे. स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी. उद्दामपणा करू नये. सोबतच पोलिस बंदोबस्त सुरू करण्यात यावा.

- नितेश मांडवकर, उपसरपंच, मकरधोकडा

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेnagpurनागपूरDeathमृत्यू