शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

समाजाला जोडणारा शायर हरविला

By admin | Published: February 09, 2016 2:44 AM

आपल्या सहजसुंदर रचनांनी हिंदी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शायर निदा फाजली यांचे सोमवारी निधन झाले.

निदा फाजली यांच्या निधनाने साहित्य जगतात शोकनागपूर : आपल्या सहजसुंदर रचनांनी हिंदी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शायर निदा फाजली यांचे सोमवारी निधन झाले. आपल्या सुंदर रचनांनी समाजाला जोडणारा दुवा हरविला आहे. उपराजधानीच्या हिंदी, उर्दू साहित्यकारांनी निदांसोबत घालविलेल्या क्षणांना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.उर्दू साहित्यात हिंदीला ओळख दिलीनिदा फाजली यांच्या निधनाने उर्दू भाषिकांमध्ये हिंदीला ओळख मिळवून देणारा साहित्यकार हरपला आहे. त्यांनी हिंदी साहित्यात महत्त्वपूर्ण संशोधन केले आणि दोह्यांची सहज हिंदीमध्ये रचना करून लोकप्रिय केले. त्यांच्यातील विनम्रता प्रत्येकाला आपलसं करणारी होती. -प्रा. मधुप पांडेय, साहित्यकारनागपूरला घेतले होते घर१९६८ पासून निदा फाजली यांच्यशी मित्रता जुळली. आपल्याशी असलेल्या मित्रत्वामुळे निदा यांनी छावणी येथील गझल अपार्टमेंटमध्ये त्यांच्या व पत्नी मालती जोशी यांच्या नावाने एक घर खरेदी केले. मात्र नंतर ते घर विकले. निदा यांच्या निधनाने उर्दू शायरीच नाही तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे.-जफर कलीम, ज्येष्ठ उर्दू शायरमानवतेला जिवंत ठेवणारा शायरकबिरानंतर दोह्यांना पुन्हा जिवंत करून निदा यांनी समाजातील ज्वलंत मुद्यांना खरेपणाने सडेतोडपणे समाजासमोर मांडले. आपल्या शायरीने त्यांनी मानवतेला जिवंत ठेवले होते. आम्ही आज आमच्या मार्गदर्शकाला मुकलो आहोत.- डॉ. सागर खादीवाला‘गया तो टुटकर रोया’निदा फाजली यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले आहे. त्यांचे दोहे समाजातील ज्वलंत मुद्यांनाही आरसा दाखविणारे होते. निदा साहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘बिछडकर फुटकर रोया-गया तो टुटकर रोया’ एवढेच म्हणावेसे वाटते.-मधु गुप्ता लहानपणापासून जोडल्या गेलोवडिलांसोबत निदा यांची अतुट मैत्री होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्याशी जोडल्या गेलो. त्यांच्या शायरीत मातीचा गंध होता. बाबा ताजुद्दीन यांच्या सालाना उर्समध्येही ते अनेकवेळा सहभागी व्हायचे.- समीर कबीर, उर्दू शायरधर्मांना जोडणारे व्यक्तिमत्त्वफाजली यांच्या निधनाने उर्दू साहित्याचे नुकसान झाले. त्यांनी नेहमी समाजाला जोडण्याचे काम केले. त्यांच्या शायरीत अलीसोबतच राधा आणि कृष्णाची प्रतिमाही निर्माण होत होती.-लोकेंद्र सिंह, शायरदोह्यांमध्ये दु:खाचे वर्णननिदा यांच्या दोह्यांमध्ये समाजाच्या दु:खाचा सार वर्णन केला होता. ते केवळ उत्कृष्ट शायरच नव्हते तर साधे सरळ व्यवहार करणारे माणूस होते. -नरेंद्र सतीजा, अध्यक्ष, जगजितसिंह मंचशायरीमध्ये होती गंगाजमुनी तहजीबमुंबई येथे निदा यांच्याशी झालेली भेट एक अविस्मरणीय क्षणासारखी मनात कायम आहे. दोह्यांना पुनरुज्जीवित करून सामाजिक मुद्यांना समाजापर्यंत पोहचविले. त्यांच्या शायरीत राष्ट्रीय एकतेचे सार दिसून येते. त्यांच्या शायरीत असलेली गंगाजमुनी तहजीब सहज जाणवत होती.-निसार खान