शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 22:48 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन आपले मतदानाचे कर्तव्य बजावले. वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी १०.३० च्या सुमारास मुख्यमंत्री पत्नी अमृता व आई सरिता यांच्यासह पोहोचले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन आपले मतदानाचे कर्तव्य बजावले. वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी १०.३० च्या सुमारास मुख्यमंत्री पत्नी अमृता व आई सरिता यांच्यासह पोहोचले.लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व आहे. प्रत्येकाच्या उमेदवारांकडून आशाआकांक्षा असतात. त्याची पूर्तता व्हावी यासाठी योग्य उमेदवाराला मत देणे आवश्यक असते. मतदानाचे कर्तव्य सर्वांनी बजावलेच पाहिजे. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री येणार म्हणून त्या कालावधीत केंद्रावर जास्त प्रमाणात मतदार मतदान करण्यासाठी आले होते. यावेळी मतदार केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी वाहनेदेखील १०० मीटर अंतरावर पार्क करण्याचे निर्देश दिले होते. तेथून ते पायीच चालत गेले.मी ‘सीएम’ची आई, काम चांगलेच वाटतेयावेळी मुख्यमंत्र्यांच्या आई सरिता फडणवीस यांनीदेखील मतदान केले. सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या कामासंदर्भात त्यांना विचारले असता मी मुख्यमंत्र्यांची आई आहे. इतर मातांप्रमाणे मलादेखील मुलाचे काम चांगलेच वाटते. विशेष म्हणजे जनतेसमोरदेखील विकासाची कामे दिसून आली आहेत, असे त्या म्हणाल्या.राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांचेदेखील मतदान 

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनीदेखील वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी ९ च्या सुमारास कुटुंबीयांसह मतदान केले. विशेष म्हणजे राज्यपाल असूनदेखील पुरोहित हे मतदानासाठी रांगेत लागले होते. मतदान करून बाहेर निघाल्यानंतर पुरोहित यांनी सर्वांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन केले. नागपुरातील वातावरण आल्हाददायक आहे. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी बाहेर निघावे. लोकशाहीत मतदान करणे हे सर्वांचे कर्तव्य. १०० टक्के मतदान झाले पाहिजे. त्यामुळे संविधान आणखी मजबूत होईल, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस