शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

केंद्राच्या परदेशी शिष्यवृत्तीत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना फटका

By निशांत वानखेडे | Published: July 24, 2024 6:15 PM

राज्यवार काेटा सिस्टीमने दीडशे पात्र, ठरले अपात्र : पहिल्या ५० रॅंकच्या विद्यापीठातील प्रवेशार्थींनाही लाभ नाही

निशांत वानखेडे

नागपूर : केंद्र सरकारने यावर्षीपासून परदेशी शिष्यवृत्ती याेजनेत राज्यवार काेटा प्रणाली लागू केली. या काेटा प्रणालीचा यंदा सर्वाधिक फटका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना बसला. काेटा सिस्टीममुळे महाराष्ट्रातील पात्र असलेले तब्बल १४९ विद्यार्थी अपात्र ठरले. या यादीत गुजरातच्या केवळ ६ विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले.

परदेशी विद्यापीठात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्याप्रमाणे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे परदेशी शिष्यवृत्ती याेजना राबविली जाते. याअंतर्गत देशभरातील १२५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमात शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाताे. यापूर्वी काेटा प्रणाली लागू नव्हती, पण यावर्षीपासून राज्यनिहाय १० टक्के काेटा ठरविण्यात आला. परदेशी विद्यापीठांच्या जागतिक मानांकनानुसार विद्यार्थ्यांना याेजनेचा लाभ दिला जाताे.

यंदा या याेजनेसाठी महाराष्ट्रातून ३०५ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज केले हाेते. त्यातील १७१ विद्यार्थी पात्र ठरले तर इतर विद्यार्थी कागदपत्रांच्या चुकांमुळे अपात्र ठरले. मात्र पात्र ठरलेल्या १७१ पैकी केवळ २२ विद्यार्थ्यांना याेजनेचा लाभ देण्यात आला असून इतर १४९ विद्यार्थी पात्र असूनही काेटा प्रणालीमुळे याेजनेचे लाभार्थी ठरू शकले नाही. विशेष म्हणजे यातील जवळपास १०० विद्यार्थ्यांचे जागतिक मानांकनात पहिल्या ५० मध्ये असलेल्या विद्यापीठात नंबर लागले आहेत. तरी ते याेजनेचे लाभार्थी ठरू शकले नाही. देशभरातून याेजनेसाठी ७५० च्यावर अर्ज प्राप्त झाले हाेते.

महाराष्ट्रातील विद्यार्थी असतात अधिकविशेष म्हणजे केंद्राच्या याेजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अधिक असतात. याचे कारण महाराष्ट्र राज्याच्या परदेशी शिष्यवृत्ती याेजनेत केवळ ७५ विद्यार्थ्यांनाच लाभ मिळताे. त्यामुळे ते केंद्र सरकारच्या परदेशी शिष्यवृत्ती याेजनेकडे धाव घेतात.

इतर राज्यांच्या याेजनेत लाभ जास्त

मात्र कर्नाटक राज्यात सर्वाधिक ५०० विद्यार्थी, आंध्र प्रदेशात २००, राजस्थानमध्ये २०० विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाताे. केरळ राज्यात तर मागतील तेवढ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार लाभ दिला जाताे. इतरही राज्यात हा आकडा १०० हून अधिकच आहे. महाराष्ट्रातून केवळ ७५ विद्यार्थ्यांना पाठविले जाते.

केंद्र सरकारचाही काेटा कमीचजेव्हा राज्यात १००, २०० विद्यार्थ्यांना लाभ दिला जात असताना केंद्र सरकारद्वारे देशभरातून केवळ १२५ विद्यार्थ्यांची मर्यादा ठरविण्यात आली आहे. त्यातही आता राज्यनिहाय काेटा प्रणाली ठरविण्यात आल्याने त्याचा फटका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनाच हाेणार आहे, कारण येथेही केवळ ७५ जागांची मर्यादा आहे.

"केंद्र सरकारने परदेशी शिष्यवृत्ती याेजनेसाठी देशभरासाठी १२५ हून अधिक जागा वाढविण्याची गरज आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनेही याेजनेच्या जागा वाढविण्याची गरज आहे. कारण ज्या राज्यांच्या जागा जास्त आहेत, तेथील विद्यार्थी केंद्राच्या याेजनेसाठी जास्त अर्ज करीत नाही. तुलनेत महाराष्ट्रातील अर्ज अधिक असतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्य स्तरीय शिष्यवृत्ती याेजनेच्या जागा वाढविण्याचा विचार करावा."

- राजीव खाेब्रागडे, सदस्य, द प्लॅटफार्म

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर