शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यीत शाळा अधिनियम, सुधारणा विधेयक विधानसभेमध्ये संमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 20:40 IST

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यीत शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा विधेयक आज विधानसभेमध्ये संमत करण्यात आले. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागासह राज्यातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे.

नागपूर : महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यीत शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा विधेयक आज विधानसभेमध्ये संमत करण्यात आले. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागासह राज्यातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे.   कोणत्याही विद्यार्थ्याची गुणवत्ता कमी होणार नाही, तसेच शिक्षक व पालकांचे शोषण होणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले आणि उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, या हेतूनेच शिक्षण क्षेत्रात या‍ विधेयकातील दुरुस्तीनुसार एक पुढच पाऊल टाकत आहोत, अशी स्पष्ट भूमिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेमध्ये मांडली.  

विधानसभेत शिक्षणमंत्री तावडे यांनी महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यीत शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 मध्ये सुधारणा विधेयक विचारात घेण्याचा प्रस्ताव मांडला. राज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाकरीता नवीन शाळा स्थापन करण्यास परवानगी देणे, विद्यमान शाळेस दर्जावाढ देणे याकरीता महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 मध्ये दुरुस्तीची विधेयक मांडण्यात आले. या मूळ विधेयकाची अंमलबजावणी 2013 पासून लागू झाली आहे. हा कायदा लागू होऊन 4 वर्षाचा कालावधी झाला आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी विविध संबंधित घटकांकडून शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या विधेयकामध्ये दुरुस्ती करण्यात आली. या कायद्यातील विद्यमान तरतुदीनुसार शाळा स्थापन करण्याकरीता फक्त नोंदणीकृत न्यास किंवा नोदणीकृत संस्था यांना अर्ज करता येतो. यामध्ये बदल करुन कंपनी कायदा 2013 खाली कलम 8 नुसार स्थापन केलेल्या कंपनीस ना नफा ना तोटा तत्वावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरु करण्याची परवानगी मिळणार आहे. कलम 8 अन्वये वाणिज्य, कला, विज्ञान, क्रीडा, शिक्षण, संशोधन, समाजकल्याण, धर्म, धर्मादाय, पर्यावरणाचे रक्षण किंवा अशा स्वरुपाच्या अन्य प्रयोजनासाठी स्थापन केलेली कंपनी पात्र ठरणार आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका व 'अ' वर्ग, नगरपालिका क्षेत्रात नवीन शाळा स्थापन करण्यासाठी 500 चौ.मी. चे जमिनीचे क्षेत्रफळ आवश्यक असून उर्वरीत सर्व क्षेत्रामध्ये किमान एक एकर जमीनीचे क्षेत्रफळ आवश्यक असल्याची दुरुस्ती या विधेयकात करण्यात आली आहे, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

स्वयंअर्थसहाय्यित शाळेच्या परवानगीकरीता अर्ज करण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे, असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले. या विधेयकावर पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार भास्करराव जाधव, अतुल भातखळकर, सुभाष साबणे, प्रशात ठाकूर, शशिकांत शिंदे आदी सदस्यांनी आपली मते मांडली.

विधानसभा सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर दिलेल्या उत्तरामध्ये श्री. तावडे यांनी सांगितले की, स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरु करण्याचा कायद्याची अंमलबजावणी 2013 पासून लागू झाली आहे. त्यानुसार स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर सन 2013-14 ते 2016-17 पर्यंत 10 हजार 781 शाळांना परवानगी देण्यात आली आहे. यापैकी 4,659 शाळा सुरु झाल्या आहेत. यामध्ये मराठी माध्यमांच्या 1606, उर्दू माध्यमाच्या 106, इंग्रजी माध्यमाच्या 2902, हिंदी माध्यमाच्या 42 व कन्नड माध्यमांच्या 3 शाळांचा समावेश आहे.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी तसेच राज्यात दर्जेदार शाळा सुरु होण्याच्या दृष्टीनेच या अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली आहे. काही सदस्यांनी या प्रस्तावित शाळांमध्ये फी वाढीची भिती व्यक्त केली. परंतु ही भिती निराधार आहे, कारण शाळांमधील फी वर नियंत्रण ठेवण्यासाठी शुल्क नियंत्रण कायद्याची अंमलबजवणी सुरु आहे. शाळांमधील भरमसाठ फी वाढीसंदर्भातच्या कायद्यानुसार नियुक्त केलेल्या पळशीकर समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला असून, यामध्ये काही दुरुस्ती सुचविल्या आहेत. मार्चमधील अधिवेशनात या कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर शुल्क नियंत्रण कायदा अधिक प्रभावी होईल, असा विश्वास श्री. तावडे यांनी व्यक्त केला.

राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक सुधारण्याच्या दृष्टीने नजिकच्या काळात राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात एक नवीन प्रयोग सुरु करण्याच्या विचारात आहे. राज्यात  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा पहिल्या टप्यात सुरु करण्यात येणार आहेत, असेही श्री. तावडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७