शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

महाराष्ट्राचे एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 23:04 IST

नदीजोड प्रकल्पांतर्गत साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पांमधून महाराष्ट्र आपल्या कोट्यातील एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

ठळक मुद्देनदीजोड प्रकल्पावर राज्य सरकारची घोषणा : विधानसभेत गदारोळ

आॅनलाईन लोकमतनागपूर : नदीजोड प्रकल्पांतर्गत साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पांमधून महाराष्ट्र आपल्या कोट्यातील एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून; यामुळे मुंबईपासून मराठवाड्यापर्यंतची पाण्याची कमतरता दूर होईल, त्यामुळे यावर कुणी राजकारण करू नये, असेही त्यांनी सांगितले. परंतु या उत्तराने विरोधी पक्षाचे समाधान झाले नाही. विरोधक या विषयावर आक्रमक होते. गदारोळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी स्थगित करावे लागले.अतुल भातखळकर, अजित पवार आदींनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पाच्या वस्तुस्थितीची माहिती मागत महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिले जात असल्याचा आरोप केला. यावर उत्तर देताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, २७४६.६१ कोटी रुपयाच्या या प्रकल्पात महाराष्ट्र आणि गुजरातची हिस्सेदारी आहे. पाण्याच्या वाटपात सहमती झाल्यावर केंद्र महाराष्ट्र आणि गुजरात सरकार यांच्यात सामंजस्य करार केला जाईल.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात करार झाला होता. या करारात महाराष्ट्राच्या हिताबाबत कुठलीही तडजोड करण्यात आली नव्हती. आता याचे पाणी गुजरातला देण्यात येत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी शंका उपस्थित केली की, महाराष्ट्र सरकार कदाचित पक्षासमोर लोटांगण घालेल; कारण त्यांना गुजरातबाबत विशेष प्रेम आहे.

४३२ घन लाख मीटर पाणी घेता येणार नाहीयावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र केवळ ४३२ घन लाख मीटर पाणी घेऊ शकणार नाही. हे पाणी भौगोलिकदृष्ट्या उंचीवर आहे. त्याला महाराष्ट्रात आणणे शक्य नाही. परंतु विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांनी यावर आक्षेप घेत सौरऊर्जेवर आधारित प्रकल्पाद्वारे हे पाणी महाराष्ट्रात आणण्याची सूचना केली.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Girish Mahajanगिरीश महाजन