शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विदर्भवाद्यांवरील लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 20:10 IST

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नागपूरच्या विधानभवनावर विदर्भाचा झेंडा लावण्यासाठी जात असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करीत या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.

ठळक मुद्देजनमंचची मागणी,हल्ल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नागपूरच्या विधानभवनावर विदर्भाचा झेंडा लावण्यासाठी जात असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करीत या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.इंग्रजांच्या काळात तिरंगा हाती घेतलेल्या नि:शस्त्र स्वातंत्र्य सैनिकांवर पोलिसांकरवी अत्याचार होत, त्याची आठवण या लाठीहल्ल्यामुळे आली. दुर्दैव हे की हा हल्ला आपल्याच सरकारकडून झाला. त्याहीपेक्षा वैदर्भीय जनतेचे दुर्दैव असे की वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देवून सत्तेवर आलेल्या सरकारच्या पोलीसांनी हा हल्ला केला. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की या निमित्ताने आपल्या राज्यकर्त्यांचे खायचे दात कोणते आणि दाखवायचे कोणते याचे स्पष्ट दर्शन विदर्भवादी जनतेला झाले. यापुढील निवडणुकीत मतदान करताना विदर्भवादी जनता या हल्ल्याची आठवण विसरणार नाही. या मोर्चाच्या माध्यमातून विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर सरकारचा दुटप्पीपणा उघड केला याबद्दल समिती अभिनंदनास पात्र आहे. तसेच शांततेने जात असलेल्या या मोर्चावर लाठीहल्ला करण्याची परिस्थिती कशामुळे उदभवली याची न्यायालयीन चैकशी करावी, अशी मागणीही जनमंचतर्फे पाटील यांनी केली आहे.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भPoliceपोलिस