शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

आजोबांची कमाल! वयाच्या शंभराव्या वर्षी पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 4:08 PM

आजोबांना १७ व्या वर्षापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. मात्र, त्यांनी त्याचा कवितासंग्रह प्रकाशित केला नव्हता. तर आता वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून नववर्षदिनी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

ठळक मुद्देकृष्णराव माधवराव दळवी : वयाच्या १७ व्या वर्षापासून लिहिलेल्या कवितांचा समावेश

नागपूर : या जगात प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच. कुणाला चित्र काढण्याचा, क्रिकेट खेळायचा, गाण्याचा, नाचण्याचा पण तो छंद आयुष्यभर जपणारे काहीच. एका आजोबांनी आपला कविता लिहिण्याचा छंद जोपासला आणि  वयाच्या शंभरीत आपले पहिले कवितासंग्रह प्रकाशित केले. या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नववर्षदिनी पार पडला.

कृष्णराव माधवराव दळवी यांचा जन्म १ जानेवारी १९२३ चा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथचा. १ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. ते भारत सरकारच्या सिव्हिल डिफेन्स (नेव्ही) विभागातून क्लास वन अधिकारी म्हणून निवृत्त झाले. आपल्या आयुष्यातील आलेले अनुभव व मनात संचारणाऱ्या कल्पनांना त्यांनी कवितांचे आवरण चढवले.

कृष्णराव यांना कविता लिहिण्याचा छंद वयाच्या १७व्या वर्षापासूनच होता. मात्र, त्या प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी कधीच व्यक्त केलेला नव्हता. त्यामुळे त्यांचा हा शतक पदार्पण सोहळा संस्मरणीय करण्याची कल्पना स्नुषा डॉ. अपर्णा दळवी, मुलगा दीपक दळवी यांच्या मनात आली. त्याअनुषंगाने कृष्णराव यांच्या निवडक ७५ कवितांचा संग्रह ‘मर्मध्वनी’ साकारण्याची कल्पना आली आणि मिलिंद हरदास यांनी प्रकाशनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.

त्याअनुषंगाने १ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या शतक पदार्पण सोहळ्यात या काव्यसंग्रहाचे प्रकाशन वैशाली मुलमुले यांच्या हस्ते करण्यात आले. वयाच्या शंभराव्या वर्षी आयुष्यभर रचलेल्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित होणे, हा एक दुर्मिळ योग ठरला. हा सोहळा शंकरपूर येथील बालाजी मंदिरात पार पडला. यावेळी अंजली पाठक, डॉ. उदय नारलावार यांच्यासह कौटुंबिक मंडळी उपस्थित होती.

टॅग्स :SocialसामाजिकSenior Citizenज्येष्ठ नागरिक