शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

परिषदेत मंगलप्रभात लोढांनी खिशातून राजीनामाच बाहेर काढला; विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपींमुळे व्यथित 

By योगेश पांडे | Updated: December 20, 2023 18:27 IST

हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विधानपरिषदेसाठी नाट्यमय ठरला.

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विधानपरिषदेसाठी नाट्यमय ठरला. अगोदर सुषमा अंधारे यांच्यावर सभागृह संतप्त झाले असताना विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांमुळे व्यथित झालेल्या कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहातच खिशातून कागद बाहेर काढत राजिनामा देऊन पद सोडण्याची तयारी दाखवली. मागील तीन दशकांपासून सभागृहात असून मी कुठलाही गैरप्रकार केलेला नाही. माझ्यावर किंवा कुटुंबियांवर अनियमिततेचे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हानच त्यांनी केले.

अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान दानवे यांनी लोढा यांच्यावर आरोप केले. मंत्री लोढा यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाच्याही जमिनी घ्यायच्या. मुंबईत जमिनी, ठाणे, कल्याण, भिवंडीत जमिनी घेतल्या, असं अंबादास दानवे म्हणाले. यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यावर लोढा यांचे नाव आपण मागे घेत असल्याचं दानवे म्हणाले. पण त्यानंतर लोढा यांचे नाव न घेता, दानवे यांनी त्यांचा मुंबईचे पालकमंत्री असा उल्लेख करत, आरोपांच्या फैरी चालूच ठेवल्या. काही वेळाने लोढा सभागृहात आले व त्यांनी अनपेक्षितच कृत्य केले. मागील १० वर्षांपासून मी कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय नाही. माझ्या कुटुंबाकडून सर्व नियमे पाळून व्यवसाय करण्यात येतो. कुठलेही बेकायदेशीर काम केले असेल तर माझी राजिनामा देण्याची तयारी आहे, असे म्हणत त्यांनी खिशातून कागद काढला. मी या कोऱ्या कागदावर सही करत राजिमाना देतो असेच ते म्हणाले. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मी ३० वर्षांपासून सभागृहात आहे. दानवे पुराव्यांशिवाय वाट्टेल ते आरोप करत आहेत. मी मंत्रीपदाचा कुठलाही दुरुपयोग केलेला नाही. त्यांनी पुरावे सादर करावे, असे आव्हान लोढा यांनी दिले. यावर दानवे यांनी पुरावे देण्याची तयारी दाखवली. अखेर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी केली. अनेकजण राजिनामा खिशात ठेवतात. मात्र लोढा यांनी राजिनामा देण्याची तयारी दाखवली. दानवे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी लोकपाल, पोलीस यांच्याकडे तक्रार करावी, असे त्या म्हणाल्या.

नोटीस का नाही?या प्रकारावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. सभागृहात कुणाचे नाव घ्यायचे असेल तर नोटीस देण्याचा नियम आहे. नियमांची स्पष्टता असतानाही वारंवार अस का घडतेय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला

टॅग्स :nagpurनागपूरMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा