शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शेतकऱ्यांच्या मुलांना 'केजी टू पीजी' मोफत शिक्षण द्या, बाजार समितीचे सभापती आमधरे यांची मागणी

By कमलेश वानखेडे | Published: August 30, 2022 6:08 PM

गेल्या दोन महिन्यापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले.

कामठी (नागपूर) ः ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने केजी टू पीजी शिक्षण मोफत देण्याचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी मुंबई बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे यांनी सरकारला दिलेल्या निवेदनात केली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले. दुबार पेरणी केल्यानंतरही शेतकऱ्यांचे पीक पावसामुळे हातून गेले. यातून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्यापासून शाळांना सुरुवात होते. मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याचे दिसून येत आहे.

शिक्षणाचे खासगीकरण झाल्यामुळे खासगी शाळेत मुलांना मोठे शुल्क द्यावे लागते. सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातून बाहेर निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची योजना सरकारने सुरू करावी. केजी टू पीजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या त्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षणही मोफत देण्यात यावे, अशी मागणी हुकुमचंद आमधरे यांनी केली आहे. सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात शिक्षण न घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा इशाराही हुकुमचंद आमधरे यांनी सरकारला दिलेल्या निवेदनात केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणEducationशिक्षणFarmerशेतकरी