शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

माता मृत्यूचे प्रमाण वाढलेलेच

By admin | Published: July 10, 2017 1:54 AM

मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे.

पाच वर्षांत पूर्व विदर्भात ११७० मातांचा मृत्यू : नागपूर, गडचिरोली, चंद्रपुरात सर्वाधिक नोंद

मातृ सुरक्षा दिनसुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. २०११ ते १६ या पाच वर्षांत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ११७० मातांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक ६४५ मृत्यू एकट्या नागपूर शहरातील आहे. गडचिरोलीमध्ये १२४, चंद्रपूरमध्ये ११४ तर वर्धेत ९९ मातामृत्यूची नोंद आहे. मातामृत्यू कमी व्हावा यासाठी राज्यात ‘प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान‘ (पीएमएसएमए) ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या मातांचे हिमोग्लोबिन कमी आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, पोटातील बाळाची वाढ व्यवस्थित झालेली नाही, प्लेटलेटची संख्या कमी आहे आदी माता या अतिजोखमीच्या गटात येतात. या मातांना तातडीने सर्व सुविधा आहेत तेथे प्रसुतीसाठी पाठवले जाते. परिणामी, अनेक गर्भवती महिलांना या योजनेंतर्गत उपचार मिळाले आहेत. यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत झाली झाली आहे. मात्र, रुग्णालयातील हलगर्जीपणा, गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे प्रसुतीच्या वेळी मातामृत्यूचे प्रमाण वाढल्याचे या क्षेत्रातीलच तज्ज्ञाचे म्हणणे आहे. प्रसुतीच्यावेळी माता मृत्यूचे कारण वेगवेगळे असू शकतात. माता मृत्यूचे ‘डेथ आॅडिट’ झाल्यास त्या कारणाला समजावून, व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे शक्य आहे. असे झाल्यास जास्तीत जास्त मातांचे प्राण वाचविले जाऊ शकतील.-डॉ. वर्षा ढवळे, स्त्री रोग, प्रसूती तज्ज्ञगेल्या वर्षी २५६ मृत्यूची नोंदनागपूर उपसंचालक आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०११-१२ मध्ये भंडारा जिल्ह्यात १८, गोंदियात १७, चंद्रपुरात ३२, गडचिरोलीत ३१, वर्धेत १५, नागपूर जिल्ह्यात ९, नागपूर शहरात ११७ असे मिळून नागपूर विभागात २३९ माता मृत्यूची नोंद आहे. तर, २०१५-१६मध्ये भंडाऱ्यात ८, गोंदियात ८, चंद्रपुरात १८, गडचिरोलीत २५, वर्धेत २७, नागपूर जिल्ह्यात १२ तर शहरात १५८ मिळून नागपूर सर्कलमध्ये २५६ मातामृत्यूची नोंद आहे. आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे वर्धा व नागपूर जिल्हा सोडल्यास इतर सर्व जिल्ह्यात मृत्यूची संख्या टप्प्याटप्याने कमी झाल्याचेही दिसून येते.