शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

नागपूरकरांना तारणार मध्यम प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:28 AM

तोतलाडोह प्रकल्प अजूनही कोरडा असला तरी नागपूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मात्र भरू लागले आहेत.

ठळक मुद्देमध्यम प्रकल्प ४३ टक्के भरले : तोतलाडोहमध्ये अल्प पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह प्रकल्प अजूनही कोरडा असला तरी नागपूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मात्र भरू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचे संकट ओढवलेच तर त्याचा सामना करण्यासाठी हे मध्यम प्रकल्प उपयोगाचे ठरतील.यंदा मान्सून सुरू झाला तेव्हापासून पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. आकडेवारीनुसार पाऊस चांगला झाल्याचे सांगितले जात असले तरी, नागपुरातील मोठी धरणे अजूनही कोरडी आहेत. त्यामुळे भविष्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण होते की काय? अशी भीती वर्तविली जात होती. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसाने मध्यम प्रकल्प भरू लागली आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी तोतलाडोह सोडले तर उर्वरित तीन प्रकल्पही बºयापैकी भरू लागली आहेत.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यात आजच्या तारखेला एकूण २८ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. यापैकी नागपूर जिल्ह्यात पाच मोठे प्रकल्प येतात. यामध्ये तोतलाडोह हे सर्वात मोठे धरण असून, त्याची एकूण पाणीसाठा क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. त्यात आजघडीला केवळ ११४ दलघमी म्हणजे ११ टक्के इतकाच पाणीसाठा आहे तसेच रामटेक (खिंडसी) या प्रकल्पात २२ टक्के इतका पाणीसाठा आहे. परंतु कामठी खैरी या प्रकल्पात ५३ टक्के, लोअर नांद वणा ८८ टक्के, वडगाव ८४ टक्के इतका पाणीसाठा आहे.याशिवाय नागपूर जिल्ह्यात एकूण १३ मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता २००.६ दलघमी इतकी आहे. आजघडीला ही धरणे ८६.०७ दलघमी म्हणजे ४३ टक्के इतकी भरली आहेत. यामध्ये पांढराबोडी हे १०० टक्के भरले आहे. त्यानंतर कान्होलीबारा ५८ टक्के, खेकरानाला ५२ टक्के, वेणा ४९ टक्के, सायकी ४४ टक्के, उमरी ४० टक्के, कार ३४ टक्के, कोलार ३० टक्के, मोरधाम ३२ टक्के, चंद्रभागा ३१ टक्के इतके भरले आहे. धरणांमधील साठा वाढत असला तरी उपलब्ध पाणीसाठासुद्धा पुरेसा म्हणता येणार नाही. परंतु आणखी काही दिवस सलग पाऊस होईल आणि धरणे भरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तर आवश्यक उपाययोजना केली जाईलसध्या पाऊस कमी असला तरी नागपुरातील पिकांसाठी योग्य पाऊस झालेला आहे. धानाचीही ६५ टक्के रोवणी झालेली आहे. ३५ टक्के रोवणी व्हायची आहे. काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे धानासाठीसुद्धा समाधानकारक पाऊस राहील, असा विश्वास आहे. राहिला प्रश्न पिण्याच्या पाण्याचा तर पाऊस होईल आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र तशी वेळ आलीच तर जिल्हा प्रशासन आवश्यक उपाययोजना करेल, पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ दिले जाणार नाही.- सचिन कुर्वे , जिल्हाधिकारी