शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

काही बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले, त्यांनी राजीनामे द्यावेत : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2022 4:36 PM

राज्य सरकारचे काही बोलघेवडे मंत्री बोलत राहिले, आणि समाजाचं नुकसान म्हणत राहिले. त्यांच्यामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले असून त्या ओबीसी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

नागपूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. राज्य सरकारने सादर केलेला अंतरिम अहवाल न्यायालयानं फेटाळला. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.

आघाडी सरकारने ओबीसी समाजाशी बेईमानी केली. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट पूर्ण करा आणि आरक्षण द्या, असं सांगितलं होतं. परंतु, राज्य सरकारने ते केले नाही. तसे केले असते तर आज ही वेळ आली नसती, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला. 

राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे. या सरकारने दिशाभूल करणारा अंतिम अहवाल सादर केल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्दैवी, आोबीसी समाजाचं मोठ नुकसान करणारा असल्याचे बावनकुळे म्हणाले. राज्य सरकारमधील ओबीसी असलेल्या मंत्र्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

आता आरक्षणाशिवायच आगामी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राच्या ७५ टक्के भागामध्ये निवडणुका आहेत. त्यात २००० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नगर परिषद, नगरपंचायती आणि मोठ्या महानगरपालिकांच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत. याचा प्रचंड मोठा फटका समाजाला बसला असून आता ओबीसी नेतृत्वच तयार होणार नाही. ओबीसी समाजाच नेतृत्व घालून टाकण्याची भूमिका या सरकारने घेतली असल्याची टीका त्यांनी केली.

या सरकारचे बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले आणि समाजाचं नुकसान म्हणत राहिले. त्यांच्यामुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. आजच्या स्थितीला महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी मंत्रीच जबाबदार असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तातडीने राजीनामे द्यावे अशी मागणी बोवनकुळे यांनी केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय