शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

ओसीडब्ल्यूविरोधात मनसेचा २ जून रोजी महामोर्चा

By कमलेश वानखेडे | Updated: May 31, 2023 19:09 IST

Nagpur News ओसीडब्ल्यू कंपनीतर्फे ७५ टक्के नागपूरकरांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. अशा कंपनीला पुन्हा किती संधी देणार, असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे २ जून रोजी ओसीडब्ल्यू विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.

नागपूर : नागपूरकरांना २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवून सुरू करण्यात आलेली २४ बाय ७ योजना पूर्णपणे फसली आहे. ओसीडब्ल्यू कंपनीतर्फे ७५ टक्के नागपूरकरांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. अशा कंपनीला पुन्हा किती संधी देणार, असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे २ जून रोजी ओसीडब्ल्यू विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.

मनसेचे शहर अध्यक्ष विशाल बडगे, चंदू लाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ओसीडब्ल्यु या कंपनीला राजकीय राजाश्रय आहे. त्यामुळे ही कंपनी महापालिकेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचेही पालन करीत नाही. ओसीडब्ल्युच्या मुद्यावर महापालिका आयुक्तांना चर्चेसाठी वेळ मागितली असता त्यांनी तीन महिने टाळाटाळ केली. या उन्हाळ्यात शहरातील बहुतांश भागात नळाद्वारे पुरेसे पिण्याचे पाणी मिळाले नाही. गळती, दुरुस्तीच्या नावावर अपुरा पाणीपुरवठा होत आहे. तक्रारी करूनही कुणी दखल घेत नाही. त्यामुळे या कंपनीचा कंत्राट तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही यावेळी मनसेतर्फे करण्यात आली.

ओसीडब्ल्यूची वरात मनपाच्या दारातमहापालिका प्रशासन हे ओसीडब्ल्यू कंपनीला जावयासारखी वागणूक देत आहे. कुठलीही कारवाई करीत नाही, असे सांगत ओसीडब्ल्यूची वरात मनपाच्या दारात नेत आहोत, असा चिमटाही मनसेतर्फे घेण्यात आला आहे.

टॅग्स :Morchaमोर्चाMNSमनसे