शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
3
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
4
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
5
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
6
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
7
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
8
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
9
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
10
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
11
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
12
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
13
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
14
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
15
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
16
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
17
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
18
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
19
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
20
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

आधुनिक विज्ञानाला हवी पारंपरिक ज्ञानाची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 7:19 PM

Nagpur News शेती आणि पशुसंवर्धनाच्या शाश्वत विकासाकरिता आधुनिक विज्ञानाला पारंपरिक ज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.

ठळक मुद्देयांत्रिकी शेतीमुळे कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करतात

नागपूर : जमिनीचा छोटा हिस्सा असणारे भारतातील ६५ टक्के शेतकरी यांत्रिकी शेतीच्या मोहात कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात. आधुनिक विज्ञानाच्या अतिवापराचे दुष्परिणाम जगासमोर येत असून शेती आणि पशुसंवर्धनाच्या शाश्वत विकासाकरिता आधुनिक विज्ञानाला पारंपरिक ज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.

राष्ट्रीय पशुवैद्यक विज्ञान संस्था आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या सोळावा दीक्षांत सोहळा व वैज्ञानिक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मत्स्य व पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला, राष्ट्रीय पशुवैद्यक विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश राव, माफसूचे कुलगुरू कर्नल डॉ. आशीष पातुरकर, कामधेनू पशुवैद्यक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दक्षिणकर, केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे माजी सचिव डॉ. तरुण श्रीधर प्रमुख अतिथी होते. डॉ. भागवत म्हणाले, शेती आणि पशुपालनावर आधारित संशोधन इंग्रजीत असल्याने ते शेतकऱ्यांना समजण्यास कठीण जाते. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रादेशिक भाषेला महत्त्व देण्यात आल्याने यापुढे शेतकऱ्यांना प्रादेशिक भाषेत हे साहित्य उपलब्ध झाल्यास त्यांना त्याचा लाभ होईल. कृषी आणि पशुपालनाच्या भरवशावर भारताच्या राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये वाढ करता येईल. परंतु त्यासाठी भारत केंद्रित दृष्टिकोन असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पशुविज्ञान अधिष्ठाता डॉ. शिरीश उपाध्ये, डाॅ. नितीन कुरकुरे, डाॅ. अनिल भिकाने, डॉ. आ. पा. सोमकुवर प्रामुख्याने उपस्थित होते.

देशाच्या राजकारणाची दिशा आरएसएस ठरवते - केंद्रीय मंत्री रूपाला

देशाच्या राजकारणाची दिशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवत असते, या दिशेच्या आधारावर भारत जगालाही दिशा दाखवू शकतो, असा दावा केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी यावेळी केला.

भागवत-रूपाला केदार यांना मानद फेलोशीप

यावेळी डॉ. मोहन भागवत, पुरुषोत्तम रूपाला, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, डॉ. तरुण श्रीधर, डॉ. उन्मेश चंद्र शर्मा यांच्यासह २० ज्येष्ठ पशुवैद्यकांना मानद फेलोशीपने सन्मानित करण्यात आले. केदार यांच्या अनुपस्थितीत कुलगुरू डॉ. पातुरकर यांनी फेलोशीप स्वीकारली. तसेच डॉ. के. के. सरमा, डॉ. अयप्पा आयपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत