शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महामार्गांवर मृत्यूंजय दूत उपक्रमास राज्यात १ मार्चपासून सुरूवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 20:10 IST

Mrityunjay Doot initiative : अपघातातील जखमींना मिळणार तातडीची मदत

ठळक मुद्देयेत्या १ मार्चपासून राज्यातील महामार्गांवर ठिकठिकाणी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी हे देवदूत उभे असलेले बघायला मिळणार आहे.

नरेश डोंगरेनागपूर - अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे जीव वाचविण्याच्या उद्देशाने राज्यात मृत्यूंजय दूत हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार, येत्या १ मार्चपासून राज्यातील महामार्गांवर ठिकठिकाणी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी हे देवदूत उभे असलेले बघायला मिळणार आहे.

देशात दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो. अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने आणि योग्य पद्धतीने उपचारासाठी मदत मिळत नसल्याने बऱ्याचशा जखमींचा मृत्यू होते, असे एका अहवालातून पुढे आले आहे. अपघात झाल्यानंतर बरेचवेळा जखमी रस्त्यावर विव्हळत असतो. आजुबाजुची मंडळी हे सर्व बघत असतात. परंतू, उगाच पोलिसांच्या कारवाईचे लचांड मागे लागू नये म्हणून जखमीला मदत करण्यास अनेकजण धजावत नाहीत. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन जखमींना तातडीने आणि योग्य पद्धतीने उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी ठिकठिकाणी सेवाभावी वृत्तीची प्रशिक्षीत मंडळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी राज्यातील महामार्गांवर ‘हायवे मृत्यूंजय देवदूत’ या उपक्रमाची योजना पोलीस दलासमोर ठेवली. शिर्षस्थ पातळीवरून तिला मंजुरी मिळाल्याने आता १ मार्च २०२१ पासून या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. अधिकाधिक अपघातग्रस्तांना मदत करून त्यांचे जीव वाचविणाऱ्या देवदुतांच्या कामाची नोंद करून त्यांना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषित केलेले पुरस्कारही दिले जाईल. या उपक्रमात आणखी काय करायला हवे, त्याला कसा प्रतिसाद आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या १५ आणि ३० तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातून आढावा घेतला जाणार असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.देवदुतांना मिळणार प्रशिक्षणमहामार्गावरील पेट्रोलपंप, हॉटेल्स, ढाबे तसेच मॉलमधील कर्मचारी आणि महामार्गालगतच्या गावातील सेवाभावी व्यक्ती असा प्रत्येकी ५ जणांचा ग्रुप त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करून निवडला जाईल. त्यांना सरकारी, निमसरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मार्फतीने अपघातग्रस्तांना कसे हाताळायचे, कसे उचलून स्ट्रेचर, वाहनात, अॅम्बुलन्समध्ये ठेवायचे, प्रथमोपचार कसा करायचा, त्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांच्याकडे प्रथमोपचाराची किट, स्ट्रेचर आणि आजुबाजुच्या हॉस्पिटल्सची नावे, ऍम्ब्युलन्सचा संपर्क क्रमांक उपब्ध करून दिला जाईल. त्यांना ओळखपत्र दिले जाईल आणि मृत्यूंजय देवदूत असे संबोधण्यात येईल.अनेकांचे जीव वाचवूपोलीस दलात राहून अनेक प्रशंसनीय उपक्रम राबविणारे अधिकारी म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची ओळख आहे. नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना त्यांनी मिशन मृत्यूंजय हा उपक्रम सुरू करून सुमारे ५ हजार शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांशी जोडले होते. कारागृहात असताना त्यांनी बंदिवान रजनी हा उपक्रम सुरू करून राज्य सरकारची प्रशंसा मिळवली होती. त्यांनी कारागृहात सुरू केलेल्या योगा आणि गळाभेट उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेकांचे जीव वाचविण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. उपाध्याय यांनी लोकमतजवळ व्यक्त केला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातhighwayमहामार्ग