शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

Nagpur: ‘हिट ॲंड रन’ प्रकरणात २२ दिवसांनी आरोपी ताब्यात, मात्र नोटीस देऊन सुटका, पोलिसांच्या भूमिकेविरोधात संताप

By योगेश पांडे | Published: May 30, 2024 9:48 PM

Nagpur News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना उडविण्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ दिवसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले. मात्र त्याच्यावर दाखल कलमे लक्षात घेता केवळ नोटीस देऊन त्याची सुटका करण्यात आली आहे. त्याच्या एका चुकीमुळे महिलेला मरणयातना भोगाव्या लागत असून बसणेदेखील कठीण झाले आहे.

- योगेश पांडे नागपूर - मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना उडविण्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ दिवसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले. मात्र त्याच्यावर दाखल कलमे लक्षात घेता केवळ नोटीस देऊन त्याची सुटका करण्यात आली आहे. त्याच्या एका चुकीमुळे महिलेला मरणयातना भोगाव्या लागत असून बसणेदेखील कठीण झाले आहे. मात्र कायद्याचा आधार घेत आरोपी मात्र मोकाट बाहेर पडला आहे. या प्रकरणात पोलिसांची सुरुवातीपासूनची भूमिका संशयास्पद होती व आता या प्रकारामुळे तर आणखी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

७ मे २०२४ ला सकाळी ७ च्या दरम्यान गिट्टीखदानमधील ममता संजय आदमने (वय ४५) आणि वंदना अजय पाटील या दोघींना शिवाजी चौकात एका पांढऱ्या रंगाच्या कारने चिरडले होते. सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला होता. या अपघातानंतर आदमने यांची प्रकृती खालावली असून त्यांना पलंगावरून उठणेदेखील शक्य नाही. त्यांच्या कुटुंबावर यामुळे मोठा आर्थिक ताण पडला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जखमींच्या बयाणाच्या आधारावर भादंविच्या कलम २७९, ३३७ तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १३४, १७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये आरोपीच्या कारचा नंबर स्पष्ट दिसत नसल्याचे सांगत हात झटकणे सुरू केले. अखेर सोशल माध्यमांवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ सक्रिय झाले व आरोपी कारचालकाला शोधण्यासाठी पावले उचलण्यात आली. तपासानंतर पोलिसांनी कमलेश नावाच्या कॅबचालकाला ताब्यात घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या चुकीमुळे एक महिला मरणयातना भोगत असताना त्याला केवळ नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तर त्याची कार जप्त करण्यात आली. अपघात प्रकरणातील कलमांनुसार त्याला सोडण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र गुन्हा दाखल करतानाच कठोर कलमं का लावण्यात आली नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सोशल माध्यमांमुळे आली पोलिसांना जाग?या प्रकरणात पोलीस अगोदर हात झटकत होते व सीसीटीव्हीत कारचा क्रमांक दिसत नसल्याचा दावा करत होते. मात्र हे प्रकरण सोशल माध्यमांमध्ये येताच पोलिसांना जाग आली व दोन दिवसांत आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे पोलिसांची सुरुवातीची भूमिका प्रामाणिक होती की आता दबाव निर्माण झाल्यामुळे पावले उचलण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी