शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Nagpur: शहराचे काँक्रिटीकरण प्रचंड धोकादायक, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 23:09 IST

Aditya Thackeray: नागपूर शहराचे काँक्रिटीकरण प्रचंड धोकादायक असल्याचे मत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले. कोराडी थर्मल पॉवरमध्ये आयएमए प्रकल्पाला पुन्हा सुरू करने, विकासाच्या नावाखाली वृक्षांची सर्रास कटाई करण्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी नुकताच नागपूरचा दाैरा केला.

- मेहा शर्मा नागपूर - शहराचे काँक्रिटीकरण प्रचंड धोकादायक असल्याचे मत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले. कोराडी थर्मल पॉवरमध्ये आयएमए प्रकल्पाला पुन्हा सुरू करने, विकासाच्या नावाखाली वृक्षांची सर्रास कटाई करण्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी नुकताच नागपूरचा दाैरा केला. त्यांनी पर्यावरणवादी आणि नागरिकांचे मत ऐकले आणि 'लोकमत'शी विशेष चर्चा करताना आपली प्रतिक्रिया नोंदवली.

ते म्हणाले, पर्यावरणाच्या रक्षणासाठी संघर्ष करने कुण्या एका व्यक्तीचे काम नाही. हा राजकीय मुद्दासुद्धा नाही. हे मुद्दे विधानसभेत लावून धरले जाईल. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले की, नागपूरवासी चिरस्थायी विकासासंंबंधात आपल्या भूमिकेवर अडिग आहेत, हे बघून आनंद होतो आहे. मात्र, शहराचे वेगाने होणारे काँक्रिटीकरण धोकादायक आहे. जोशीमठ याचे ताजे उदाहरण आहे. नागपूरात पर्यावरणवाद्यांनी कोराडी प्रकल्पाचा विस्तार, राखेची समस्या आणि आयएमएस प्रकल्पाशी संबंधित मुद्दे उचलून धरले आहेत. आपण मंत्री असताना या मुद्द्यांची गंभीर दखल घेऊन चुकीचे काम होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, संवादावर विश्वास नसलेल्या सरकारसोबत आज संघर्ष होताना दिसतो आहे. हा व्यक्तीगत अहंकाराचा भाग नाही तर शहराच्या वर्तमान आणि भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण शांत बसणार नसल्याचे ते म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले की, राज्य सरकार सामान्य जनतेच्या नव्हे तर बिल्डर्स आणि कंत्राटदाराच्या हिताचे धोरण राबवित आहे. सत्तेचा लोभ अन् भ्रष्टाचाराच्या जोरावर बनलेले राज्य सरकार जनहित आणि पर्यावरणाच्या हिताचे पावलं उचलत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. आमच्या सरकारने पर्यावरण आंदोलनाला सकारात्मक पद्धतीने घेऊन त्यांचे मुद्दे गांभिर्याने ऐकले. आज असे होत नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेnagpurनागपूर