शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Nagpur: जीर्ण इमारती व धोकादायक वायरिंगमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

By गणेश हुड | Published: July 04, 2024 7:23 PM

Nagpur News: ​​​​​​​नागपूर जिल्ह्यातील कालबाह्य झालेल्या धोकादायक शाळांच्या इमारती पाडून नवीन वर्गखोल्या बांधण्याची गरज आहे.  पण, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे १५०  पेक्षा जास्त शाळा खोल्या धोकादायक आहेत.

- गणेश हूड नागपूर  -  जिल्ह्यातील कालबाह्य झालेल्या धोकादायक शाळांच्या इमारती पाडून नवीन वर्गखोल्या बांधण्याची गरज आहे.  पण, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे १५०  पेक्षा जास्त शाळा खोल्या धोकादायक आहेत. गेल्या सहा ते सात वर्षांपासून त्याबाबत नुसतीच चर्चा होत आहे. त्यात इलेक्ट्रीक वायरिंग नादुरूस्त असल्याने  अशा शाळांतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जि.प.च्या १५१२ शाळा आहेत. या शाळांत ७२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सातत्याने या शाळांना विविध योजना व निधीच्या माध्यमातून शासनाकडून विकास साधण्याचा प्रयत्न होत असतो. जि.प.च्या माध्यमातूनही साहित्यांची खरेदी करून या शाळांना पुरवठा करण्यात येतो. मात्र  आजही जिल्ह्यामध्ये दिडशेहून अधिक शाळांच्या वर्गखोल्या तुन -चार दशकांपूर्वीच्या आहेत. अशा  इमारतींची अवस्था तर बिकट झालीच आहे. याशिवाय इलेक्ट्रीक वायरिंगही धोकादायक झाली आहे. अशा शाळांमध्ये सेस फंडाच्या निधीतून विद्युत व्यवस्था सुधारण्याची नितांत गरज आहे. परंतु  पदाधिकारी व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. शाळांच्या डागडुजीच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधीच्या निधीची तरतूद केली जाते. परंतु वर्षाअखेर यातील बहुतांशी निधी इतर हेडवर वळता केला जातो.

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्वच्छतागृहात पडून असलेल्या इलेक्ट्रीक वायरचा करंट बसून एका सहा वर्षीय चिमुकलीला प्राणापासून मुकावे लागले. भंडाऱ्याप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातही अशीच दुदैवी घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर