शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:08 PM

Nagpur Crime News: आचारसंहिता लागल्यानंतर पहिल्याच दिवशी नागपुरातील चंद्रमणी नगरात खळबळ घटना घडली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 

-योगेश पांडे,नागपूरविधानसभा निवडणूक जाहीर होताच जागोजागी पोलिसांनी गस्त वाढविली असतानाच आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी नागपुरात काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जुन्या वादातून ‘तुझे राजकारण संपले’ असे म्हणत दोन आरोपींनी त्याच्यावर घरासमोरच हल्ला केला. दोन्ही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे दक्षिण नागपूरचे माजी अध्यक्ष सुहास नानवटकर (३८) असे जखमी पदाधिकाऱ्याचे नाव असून, ते मागील एका वर्षापासून चंद्रमणीनगरात त्यांच्या सासुरवाडीत राहत आहेत.

कोणी केला जीवघेणा हल्ला?

आरोपी लोकेश सुरेश गयाल (२४) व कार्तिक सूरज बालगुहर (२३) हे दोघेही त्याच परिसरात राहतात. नानवटकर यांच्या सासुरवाडीच्या समोरील घरात आरोपींचे नेहमीच येणे-जाणे होते. आरोपी मंगळवारी त्यांच्या घराजवळ आले. 

रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेवण झाल्यावर नानवटकर हे त्यांच्या सासूशी बोलत घराबाहेरच उभे होते. दोन्ही आरोपी त्यांच्या पाठीमागून आले व आता तुझे राजकारण संपले असे म्हणत शिवीगाळ करू लागले. त्यांनी नानवटकर यांना जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यावर अचानक केला हल्ला 

अचानक लोकेशने वीटेने नानवटकर यांच्या उजव्या कानाजवळ प्रहार केला. यामुळे ते खाली पडले व कान रक्तबंबाळ झाला. त्याही अवस्थेत त्यांनी पत्नीसह अजनी पोलिस ठाणे गाठले व पोलिसांनी त्यांना मेडिकल इस्पितळात नेले. 

बीट मार्शल्सने घटनास्थळी पोहोचत दोन्ही आरोपींना अटक केली. सुहास यांची पत्नी तृप्ती यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(३) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे. कार्तिकविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत, तर लोकेशविरोधात सोनेगाव पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

हल्ल्यामागे राजकीय कारण नाही

नानवटकर यांनी दोन तीन वेळा त्यांना काही कारणावरून रागावले होते. त्याचा राग मनात ठेवून त्यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता आहे. या हल्ल्यामागे कुठलेही राजकीय कारण नसल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. 

आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यावर पोलिसांकडून गस्त वाढणे अपेक्षित होते. मात्र अजनी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अवैध धंदे वाढले असून गुन्हेगारांवरदेखील वचक राहिलेला नाही. नवीन ठाणेदारांकडूनदेखील हव्या त्या प्रमाणात नियोजन होत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnagpurनागपूरcongressकाँग्रेस