शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

नागपुरात सोन्याच्या आमिषाला बळी पडून गमावली आयुष्याची पुंजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 7:58 PM

अल्प किमतीत लाखोचे सोने देतो, असे आमिष दाखवून दोन भामट्यांनी एका दाम्पत्याची एक लाख रुपयांची रक्कम हडपली.

ठळक मुद्देदोन भामट्यांनी केली फसवणूक : नंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्प किमतीत लाखोचे सोने देतो, असे आमिष दाखवून दोन भामट्यांनी एका दाम्पत्याची एक लाख रुपयांची रक्कम हडपली. कमी किमतीत सोने मिळत असल्याच्या आमिषापोटी आपली आयुष्याची पुंजी गमावणाऱ्या या दाम्पत्याचे नाव निर्मला आणि नंदकिशोर समर्थ असे आहे. समर्थ दाम्पत्य विद्यानगर इन्द्रादेवी टाऊनमागे राहतात. ते रमणा मारोती परिसरात हातठेल्यावर भाजीपाला विकतात. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. तेथे काबाडकष्ट करून भाजीपाला आणि कापूस पिकवतात. अनेक दिवस काटकसर करून आणि यावर्षी पिकविलेला कापूस विकून त्यांनी एक लाख रुपयांची रक्कम जमा केली होती. १२ मेच्या सायंकाळी नंदकिशोर समर्थ यांना दोन आरोपी भेटले. भाजी घेण्याच्या बहाण्याने गप्पा करत त्यांनी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आहेत. लॉकडाऊनमुळे पैशाची अत्यंत अडचण असल्यामुळे ते अल्प किमतीत आपण विकणार आहोत असे म्हणाले. तुम्हाला लाखो रुपयांचे दागिने फक्त एक लाख रुपयात देऊ, असे आमिष आरोपींनी समर्थ यांना दाखविले. दागिने पाहिजे असल्यास आपल्याला फोन करा, असे सांगून आरोपींनी त्यांचा मोबाईल क्रमांकही समर्थ यांना दिला.लाखोंचे दागिने केवळ एक लाख रुपयांत मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडून समर्थ दाम्पत्यांनी ते विकत घेण्याची तयारी दाखवली. दागिने असली की नकली हे तपासण्यासाठी आरोपीने समर्थ यांना फोन करून काही दिवसांनंतर नंदनवनमधील खरबी चौकात गोस्वामी डेअरीजवळ बोलविले. त्यानुसार नंदकिशोर समर्थ हे दागिने बघायला तेथे गेले. आरोपींनी त्यांना एक माळ दाखवली. ती सोन्यासारखी दिसत होती. त्यातील एक मणी तोडून आरोपींनी समर्थ यांना दिला. तो खरा की खोटा, हे तुम्ही सराफांकडून तपासून घ्या, असे ते म्हणाले. त्यानुसार समर्थ यांनी तो सोन्याचा मणी आपल्या ओळखीच्या सराफाला दाखवला. तो मणी असली सोन्याचा असल्याचे सराफाने सांगितले. त्यामुळे नंतर आरोपीचा जेव्हा फोन आला, तेव्हा समर्थ यांनी ती माळ एक लाख रुपयात विकत घेण्याची तयारी दाखवली. ठरल्याप्रमाणे आरोपींनी २९ मेच्या पहाटे ५.३० ला समर्थ यांना छोटा ताजबाग परिसरात बोलविले. समर्थ दाम्पत्य एक लाखाची रक्कम घेऊन तेथे पोहोचले. समर्थ यांच्याकडून एक लाख रुपये घेऊन त्यांना आरोपींनी त्यांच्याजवळची सोन्यासारखी माळ दिली. ही माळ घेऊन समर्थ दाम्पत्य सराफाकडे गेले असता ती सोन्याची नव्हे तर सोन्यासारखी दिसणारी पिवळ्या धातूची माळ असल्याचे सराफाने सांगितले. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर समर्थ दाम्पत्यांनी आरोपीच्या मोबाईलवर वारंवार संपर्क केला. मात्र आरोपींनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शुक्रवारी समर्थ दाम्पत्याने नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार संदिपान पवार यांनी लगेच तक्रार नोंदवून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.पुन्हा वळवळते टोळीअल्प किमतीत सोन्याचे दागिने देतो, असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या राजस्थानमध्ये सक्रिय होत्या. या टोळ्यांनी नंतर आपले फसवणुकीचे नेटवर्क संपूर्ण देशात विस्तारले. मात्र जागोजागच्या पोलिसांनी त्यांना अटक केल्यामुळे आपला हा गोरखधंदा बंद केला. नागपुरात मात्र या टोळीची पिलावळ अजूनही वळवळत असून, अधूनमधून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या बांधण्याची तयारी नंदनवन पोलिसांनी चालविली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीGoldसोनं