शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळालाच झाला डेंग्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 23:34 IST

डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. अशा डेंग्यूच्या विळख्यात मेडिकल व डेंटल महाविद्यालयातील १२-१५ विद्यार्थी व निवासी डॉक्टर सापडले आहेत. विविध वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, सध्या मेडिकलमध्ये याच आजाराचे २५वर रुग्ण उपचार घेत आहेत. यातच रुग्णालयाच्या परिसरात, डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक, परिचारिका व कर्मचाऱ्यांना हा आजार होण्याचा धोका वर्तविला जात आहे.

ठळक मुद्दे१५ वर विद्यार्थी, डॉक्टरांवर उपचार : रुग्ण, नातेवाईक, परिचारिकाही धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. अशा डेंग्यूच्या विळख्यात मेडिकल व डेंटल महाविद्यालयातील १२-१५ विद्यार्थी व निवासी डॉक्टर सापडले आहेत. विविध वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, सध्या मेडिकलमध्ये याच आजाराचे २५वर रुग्ण उपचार घेत आहेत. यातच रुग्णालयाच्या परिसरात, डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक, परिचारिका व कर्मचाऱ्यांना हा आजार होण्याचा धोका वर्तविला जात आहे.डेंग्यू व स्क्रब टायफससह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मेडिकलमध्ये डेंग्यूसारख्या आजाराने नुकताच एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे, तर ४०च्या वर डेंग्यूचे रुग्णांची नोंद आहे. अशाही स्थितीत सर्वकाही आलबेल आहे, असेच दाखवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून होत आहे. मात्र, परिस्थिती अतिशय वाईट आहे. मेडिकल परिसरातील विविध वसतिगृहातील विद्यार्थी डेंग्यूच्या विळख्यात सापडले आहेत. आता यात निवासी डॉक्टरांची भर पडली आहे.सूत्रानुसार, शासकीय दंत महाविद्यालयातील (डेंटल) आठच्यावर विद्यार्थी तर मेडिकलचे तीनच्या वर विद्यार्थी आणि चारवर निवासी डॉक्टर विविध वॉर्डात डेंग्यूवर उपचार घेत आहेत. मेडिकल रुग्णालयाच्या परिसरात डेंग्यू वाढत असताना अद्यापही उपाययोजना हाती घेण्यात आली नाही. विद्यार्थ्यांच्या मते, वसतिगृहांमध्ये व परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. यातच सांडपाण्याची पाईपलाईन काही ठिकाणी बुजल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत, परंतु साधी फवारणी करण्यात आली नसल्याचे विद्यार्थी व निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.डेंग्यूची चाचणीही बंदडेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णाची ‘एनएस१’ चाचणी केली जाते. पहिल्या पाच दिवसांत ही चाचणी उपयोगी ठरते. त्यानंतर ही चाचणी निगेटिव्ह येते. यामुळे दुसरी ‘आयजीएम’ ही चाचणी करावी लागते. तर यापूर्वी डेंग्यूचे संक्रमण झाले आहे का हे पाहण्यासाठी ‘आयजीजी’ ही चाचणी करावी लागते. रुग्णाच्या दृष्टिकोनातून या तीनही चाचण्या महत्त्वाच्या आहेत. परंतु गेल्या आठवड्यापासून या चाचण्या बंद पडल्या आहेत.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdengueडेंग्यू