शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मनपाची ‘अभय योजना’ ; दंडाच्या रकमेत मिळणार ८० टक्के सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 14:17 IST

उपमुख्यमंत्र्यांची नागपूरकरांना नवीन वर्षाची भेट : थकबाकीदारांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील मालमत्ता, पाणीकर थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने ‘अभय योजना’ आणली आहे. थकीत मालमत्ता कर, पाणी शुल्क, बाजार विभागाची दुकाने, ओटे, जागेच्या वापर शुल्कावरील शास्ती व दंडात ८० टक्के सूट असलेल्या अभय योजनेचा उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुभारंभ केला. उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर शहरातील थकबाकीदारांना नवीन वर्षाची भेट दिली आहे.

यावेळी जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. नितीन राऊत, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, विकास ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम आदी उपस्थित होते.

‘अभय योजने’अंतर्गत १ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर, पाणी शुल्क, बाजार विभागाचे दुकाने, ओटे, जागेच्या वापर शुल्कावरील शास्ती व दंडात ८० टक्के सूट दिली जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना मनपा मुख्यालय किंवा संबंधित झोन कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने देखील कर, शुल्क जमा करता येईल. या योजनेचा लाभ नागपूर शहरातील जवळपास ४.५ लाख थकबाकीदारांना मिळणार आहे. या योजनेला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास मनपा तिजोरीत ५५० कोटींचा महसूल होण्याचा अंदाज आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा जास्तीत करदाते, उपभोक्ता व परवानाधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अभय योजनेच्या कालावधीत करदाते, उपभोक्ते व परवानेधारकांनी महापालिकेला द्यावयाची मूळ रक्कम एकमुस्त १०० टक्के व उर्वरित २० टक्के शास्ती व दंड रक्कम मनपा निधीत जमा करणे अनिवार्य राहील. सदर योजना सुरू होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रकमेचा परताव्यासाठी या योजनेअंतर्गत मागणी, दावा करता येणार नाही.

न्यायालयातील दावे मागे घ्यावे लागतील

ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे त्या कालावधीचे कोणताही दावा व रिट याचिका न्यायालयात प्रलंबित असल्यास ती विनाअट मागे घ्यावी लागेल. जर अभय योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अपील पुनर्निरीक्षणासाठी आलेले आवेदन, संदर्भ आवेदन, न्यायालयात केलेला दावा किंवा रिट याचिका दाखल केली, तसेच भविष्यात या योजनेतील लाभधारक मालमत्ताकराकरिता थकबाकीदार आढळल्यास अभय योजनेनुसार संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती काढून घेण्यात येतील. अभय योजनेचे लाभधारक भविष्यात थकीतदार राहणार नाही, असा लिखित वचननामा संबंधित लाभधारकांनी लाभ घेतेवेळी सादर करणे आवश्यक राही

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका