शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Nagpur: इंग्रजकालीन नियमाची रेल्वेकडून स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी

By नरेश डोंगरे | Updated: July 16, 2024 19:33 IST

Nagpur: वेटिंग तिकिट काढून रिझर्वेशनच्या डब्यात बसायचे. पुढे टीसीच्या हातात दंडाची रक्कम भरून आपला प्रवास सुरळीत करून घ्यायचा, हा प्रकार आता चालणार नाही. टीसी दंडाची रक्कम वसूल करेलच मात्र लगेच तुम्हाला त्या डब्यातून खालीदेखिल उतरवून देईल.

- नरेश डोंगरे नागपूर - वेटिंग तिकिट काढून रिझर्वेशनच्या डब्यात बसायचे. पुढे टीसीच्या हातात दंडाची रक्कम भरून आपला प्रवास सुरळीत करून घ्यायचा, हा प्रकार आता चालणार नाही. टीसी दंडाची रक्कम वसूल करेलच मात्र लगेच तुम्हाला त्या डब्यातून खालीदेखिल उतरवून देईल. होय, इंग्रजांच्या काळातील या नियमाची रेल्वेकडून आता स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी सुरू झाली आहे.

लांबचा प्रवास म्हटला की सर्वप्रथम रेल्वेच नजरेसमोर येते. कारण प्रवासात ईतर सुविधा तर असतातच मात्र तिकिट कन्फर्म असेल तर बर्थवर झोपूनही जाता येते. त्यामुळे रोज लाखो प्रवासी रेल्वेचे तिकिट काढतात. मात्र, अनेकांना कन्फर्म तिकिट मिळत नाही.

विशेष म्हणजे, तिकिट ऑनलाईन केले असेल आणि ते प्रतिक्षा यादीवर असल्यास कन्फर्म न झाल्यामुळे आपोआप रद्द होते. मात्र, प्रत्यक्ष काऊंटरवर काढलेले तिकीट रद्द होत नाही. त्यामुळे अनेक जण वेटींग तिकिट घेऊन आरक्षित डब्यातून प्रवास करतात. गेल्या जून महिन्यापर्यंत वेटींगचे तिकिट जवळ घेऊन प्रवासी आरक्षित कोचमध्ये चढून प्रवास करायचे. तिकिट तपासणीस जवळ आल्यास तो ते तिकिट पाहून संबंधित प्रवाशाकडून दंडाची रक्कम घेऊन पावती हातात ठेवायचा आणि निघून जायचा. दुसरीकडे दंड भरल्यामुळे संबंधित प्रवासी पुढचा प्रवास त्याच कोचमधून करीत होता. मात्र आता दंड भरल्यावरदेखिल संबंधित प्रवासी त्या कोचमधून प्रवास करु शकणार नाही. कारण अशा प्रवाशांमुळे त्या कोचमध्ये प्रवाशांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त व्हायची आणि त्यामुळे कन्फर्म तिकिट घेऊन बसलेल्यांना अशा अतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीचा त्रास व्हायचा.

त्यासंबंधाने ओरड, तक्रारी वाढल्याने रेल्वेने आता वेटींग तिकिटावर रेल्वेतून प्रवास करण्यासंदर्भात मोठे बदल केले आहे. त्यानुसार, वेटींग तिकिटावर रेल्वे प्रवास केल्यास टीटी संबंधित प्रवाशाकडून दंडाची रक्कम वसूल करेल. एवढेच नव्हे तर दंड घेतल्यानंतर त्या प्रवाशाला पुढच्या स्थानकावर त्या डब्यातून उतरवूनसुद्धा देणार आहे.रेल्वेचा हा नियम इंग्रजांच्या काळातच तयार करण्यात आला होता. मात्र, त्याकडे कानाडोळा केला जात होता. आता मात्र त्याची कठोरपणे अंमलबजावणी सुरु झाली आहे. ... तर, तिकिट रद्द करून रक्कम परत घ्या !यापुढे काउंटरवर जाऊन तुम्ही तिकिट काढले असेल आणि ते प्रवासाच्या वेळेपर्यंत कन्फर्म झाले नसेल तर तिकिट रद्द करून प्रवासी आपले पैसे परत घेऊ शकतात. असे न करता त्या तिकिटावर प्रवास केल्यास तिकिट कन्फर्म होणार नाही आणि नाहक दंडाचीही रक्कम भरावी लागणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर