शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

Nagpur: शिंदे सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम नाही, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे मत

By कमलेश वानखेडे | Published: May 11, 2023 3:24 PM

Nagpur: राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालाने राज्य सरकारला धोका नाही, रकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही, ही बाब स्पष्ट झाली असे मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

- कमलेश वानखेडे 

नागपूर - राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालाने राज्य सरकारला धोका नाही, रकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही, ही बाब स्पष्ट झाली असे मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

अॅड. निकम म्हणाले, न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटना पिठाकडे पाठविले आहे. हा एकप्रकारे राज्य सरकारला मोठा दिलासा आहे. न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या कृतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांची कृती अयोग्य ठरविली आहे. एखाद्या पक्षातील दोन गट भांडत असेल तर चौकशी स्पीकरने घ्यायला पाहिजे मात्र, राज्यपालांना अधिकार नसताना देखील त्यांनी हस्तक्षेप केला, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्य मंत्रीपदाचा राजीनामा मी राज्यपालांच्या अयोग्य कृतीमुळे देत आहे तर त्यांच्या सरकारची त्यांच्यासह पुर्नस्थापना करता आली असता. मात्र, त्यांनी स्वईच्छेने राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारची पुनर्स्थापना होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे ॲड. निकम म्हणाले. १६ आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांनी कधी निर्णय घ्यावा हे स्पष्ट नसले तरी विशिष्ट मुदतीत अध्यक्षांनी हा निर्णय घेणे अपेक्षित आहे.

विद्यमान अध्यक्षांकडे हा अधिकार आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षUjjwal Nikamउज्ज्वल निकम