शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

वेदप्रकाश मिश्रांना यांना नागपूर विद्यापीठाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:53 IST

गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाड्.मय चौर्यकर्म केल्याप्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देस्नातकोत्तर पदविका वाड्.मय चौर्यकर्मप्रकरण : १५ दिवसांत उत्तर देण्याची मुदत

आॅनलाईन लोकमतनागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाड्.मय चौर्यकर्म केल्याप्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावण्यात येणार आहे. तब्बल ३० वर्षांच्या कालावधीनंतर या प्रकरणात विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. गुरुवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर ‘मॅरेथॉन’ चर्चा झाली. यानंतर ही नोटीस बजाविण्याचे ठरविण्यात आले.डॉ.मिश्रा यांनी १९८७ साली गांधी विचारधारा अभ्यासक्रमात शोध प्रबंध सादर करताना गैरप्रकार केल्याचा आरोप तत्कालिन विधीसभा सदस्य रामभाऊ तुपकरी यांनी १९९१ मध्ये लावला होता. तत्कालिन कुलगुरूंनी न्यायिक चौकशीचे आदेश दिले होते. न्या.रत्नपारखी समितीने १९९२ साली काही तथ्य विद्यापीठासमोर मांडले. यानुसार डॉ.मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर.व्ही.राव यांनी १९६९ साली लिहीलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती. त्यानंतर ९ आॅक्टोबर १९९२ साली तत्कालिन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत रत्नपारखी समितीच्या अहवालाला मान्य करण्यात आले. डॉ.मिश्रा यांनी या निर्णयाला दिवाणी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी न्यायालयाने हा दावा खारीज केला होता. १९९२ च्या निर्णयानुसार आतापर्यंत डॉ.मिश्रा यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती.यासंदर्भात गुरुवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार या नोटीशीच्या माध्यमातून डॉ.मिश्रा यांच्याकडून या प्रकरणात लेखी स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे. यासाठी १५ दिवसांचा वेळ देण्यात येणार आहे. १ महिन्यानंतर परत परीक्षा मंडळाची बैठक बोलविण्यात येणार असून यावेळी त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला पक्ष मांडावा लागेल. त्यानंतर परीक्षा मंडळ पुढील निर्णय घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. डॉ.मिश्रा यांना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे व नैसर्गिक न्यायानुसार त्यांना ही संधी देण्यात आली आहे, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले.मिश्रांना कसा मिळाला पुरस्कार ?डॉ.वेदप्रकाश मिश्रा प्रणित ‘सेक्युलर पॅनल’ने मागील महिन्यात झालेल्या प्राधिकरण निवडणूकांत यश मिळविले. डॉ.मिश्रा यांचा विद्यापीठ वर्तुळात प्रभाव असून त्यांना विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान मानण्यात येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन गौरव पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. जर मिश्रा यांच्याविरोधात असे आरोप होते, तर त्यांना हा पुरस्कार का देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पुरस्काराच्या निवड समितीत आताच्या परीक्षा मंडळातील काही सदस्य होते.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर