शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपूर विद्यापीठ : 'पीएचडी' नोंदणीचे आव्हान एकाच टप्प्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 20:18 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून विद्यापीठाने दोन टप्प्यात ‘पेट’ घेणे सुरू केले असून उमेदवारांसमोरील आव्हानदेखील वाढले आहे.

ठळक मुद्देदोन्ही पेपर वस्तुनिष्ठ करण्याचा मानस

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून विद्यापीठाने दोन टप्प्यात ‘पेट’ घेणे सुरू केले असून उमेदवारांसमोरील आव्हानदेखील वाढले आहे. शिवाय दोन टप्प्यांमध्ये काही दिवसांचे अंतर असल्याने उमेदवारांना प्रतीक्षादेखील करावी लागते. त्यामुळे एकाच टप्प्यात दोन्ही पेपर घेण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. शिवाय दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ पद्धतीनेच घेण्याबाबतदेखील विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मागील काही वर्षांपासून ‘पेट-१’ व ‘पेट-२’ अशा दोन परीक्षा घेण्यात येतात. ‘पेट-१’मध्ये सामान्य ज्ञान व ‘अ‍ॅप्टिट्यूड’संबंधित प्रश्न असतात तर ‘पेट-२’मध्ये विषयाशी संबंधित प्रश्नांना स्थान असते.‘पेट-२’ मध्ये उमेदवारांना लांबलचक उत्तरे लिहावी लागतात. या परीक्षेची पातळी कठीण असल्याने अनेक उमेदवार नोंदणीसाठी पात्र ठरण्यास अपयशी ठरले. शिवाय ‘पीएचडी’, ‘एमफिल’, ‘डीलिट’ व ‘डीएस्सी’च्या नियमांसंदर्भात विद्यापीठात बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेने डॉ. दिलीप पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली. या समितीच्या माध्यमातून काही दिशानिर्देशांत बदल करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार जर नवीन नियम लागू झाले तर याचा फायदा पुढील शैक्षणिक सत्रात ‘पेट’मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना होईल.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाने ‘पेट-१’ व ‘पेट-२’ दोन्ही परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचा मानस केला आहे. शिवाय ‘पेट-२’मधील प्रश्न हे वस्तुनिष्ठ असू शकतील का, याबाबतदेखील विचार सुरू आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. अद्याप काहीही अंतिम झालेले नाही. समिती यावर अभ्यास करीत आहे. मात्र ‘पेट-१’ व ‘पेट-२’ यादरम्यान १५ दिवसांचा कालावधी असतो. त्यामुळे उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे एकाच टप्प्यात दोन्ही परीक्षा होतील का, याबाबत विचार सुरू आहे. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ पद्धतीने काढणे शक्य होईल का, याचीदेखील चाचपणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ