शहरं
Join us  
Trending Stories
1
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
2
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
3
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
4
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
5
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
6
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
7
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
8
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
10
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
11
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
12
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
13
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
14
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
15
'मिट्टी में मिला देंगे...', 'योगी'राजमध्ये आतापर्यंत किती गुन्हेगारांचा एन्काउंटर? पाहा आकडेवारी
16
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
17
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
18
"लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?", काँग्रेसचा सवाल
19
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
20
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 

नागपूर-वर्धा ‘फोर्थ रेल्वे लाईन’

By admin | Published: May 20, 2016 2:45 AM

आता नागपूर ते वर्धापर्यंत चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर दोन रेल्वे लाईन अस्तित्वात आहेत.

तिसऱ्या लाईनसोबतच होणार काम : अपेक्षित खर्चाचा मसुदा तयार होतोयवसीम कुरैशी  नागपूरआता नागपूर ते वर्धापर्यंत चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर दोन रेल्वे लाईन अस्तित्वात आहेत. तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम वेगात सुरू असून चौथ्या लाईनचे काम यासोबतच करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतर्फे चौथ्या लाईनसाठी अपेक्षित खर्चाचा मसुदा तयार केला जात आहे.सध्याच्या दोन लाईनवर केवळ २०० रेल्वेगाड्या चालविल्या जाऊ शकतात पण, सध्या सुमारे ३२५ रेल्वेगाड्या धावत आहेत. नागपूर-वर्धा हा मध्य रेल्वेचा बॉटल नेक मार्ग म्हणून ओळखला जातो. तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनमुळे या मार्गावरील दबाव पुढील अनेक वर्षांसाठी कमी होईल. सूत्रानुसार चौथ्या लाईनला किमान ६०० कोटी रुपये खर्च लागू शकतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून चौथ्या लाईनचे काम सुरू होऊ शकते. या मार्गावर असलेला रेल्वेगाड्यांचा दबाव व भविष्यातील योजना लक्षात घेता चौथी लाईन टाकण्याच्या दिशेने वेगात पावले उचलली जात आहेत. दोन वर्षांपूर्वी तिसरी लाईन टाकण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. नागपूर-नागभीड नॅरोगेज लाईन ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित केल्यानंतर नागपूर-वर्धा तिसऱ्या लाईनची गरज उरणार नाही असे कारण पुढे करण्यात आले होते. परंतु, अनेक अडचणीनंतर तिसऱ्या लाईनचा मार्ग मोकळा झाला. आता चौथ्या लाईनचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमार्ग अनुपलब्ध असण्याचा फटका मालगाड्यांना नेहमीच सहन करावा लागतो. चौथी लाईन पूर्ण झाल्यानंतर मालगाड्यांच्या वाहतुकीस गती मिळेल. यातून रेल्वेच्या उत्पन्नात वृद्धी होईल. प्रवासी गाड्यांपेक्षा मालगाड्यांच्या माध्यमातून रेल्वे मंडळाला जास्त महसूल मिळतो. याशिवाय नागपूर-वर्धा मार्गावर दुप्पट संख्येने गाड्या धावत असल्यामुळे रेल्वेलाईनच्या देखभालीसाठी जास्त वेळ मिळत नाही. यातच रेल्वेलाईनची देखभाल करणाऱ्या ट्रॅकमॅनची संख्या कमी आहे. अनेक ट्रॅकमॅन व गँगमॅन अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर काम करीत असतात. चौथ्या लाईनमुळे देखभालीची समस्याही दूर होईल.(प्रतिनिधी)तिसऱ्या लाईनचा खर्च दुप्पटतत्कालीन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी २०१२-१३ या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर-वर्धा तिसऱ्या लाईनची घोषणा केली होती. या योजनेवर त्यावेळी २९७. ८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, कामास विलंब केल्यामुळे योजनेचा खर्च वाढून ५०० कोटी रुपये झाला आहे. अजनी, खापरी, गुमगाव, बुटीबोरी, बोरखेडी, सिंदी, तुळजापूर, सेलू, वरुड इत्यादी गावांवरून जाणारा हा मार्ग ७६.३ किलोमीटर लांब आहे. या मार्गावर २३ मानवरहीत रेल्वेगेट आहेत. तिसऱ्या लाईनसाठी खापरी व जामठ्याजवळ लहान पूल बांधण्यात आले आहेत. धाम नदी व किस्तना नदीवर मोठे पूल बांधण्यात येत आहेत. चौथ्या लाईनसाठीही एवढेच पूल बांधले जातील. तिसऱ्या लाईनच्या योजनेचे प्राथमिक सर्वेक्षण २०१३ मध्येच पूर्ण झाले होते. परंतु, प्रत्यक्ष कामाला गेल्यावर्षीपासून सुरुवात झाली.