शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

जनता समजदार; कोल्हापूरप्रमाणे भाजपची राज्यभर पोलखोल होणार; नाना पटोलेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 6:31 PM

योग्य वेळी जनता मतपेटीतून भाजपची पोलखोल करेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

ठळक मुद्देकेंद्रातील खुर्ची वाचविण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

नागपूर : ‘सर्वच पक्ष निवडणुकांची तयारी करीत आहेत. भाजपने पोलखोल यात्रा सुरू केली आहे. मात्र, जनता समजदार आहे. कोल्हापूरच्या जनतेने भाजपची चांगलीच पोलखोल केली. आता राज्यभरातील जनता मतदानाच्या माध्यमातून भाजपची पोलखोल करेल,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केली.

पटोले म्हणाले, ‘केंद्रातील भाजप सरकार गेल्या आठ वर्षांत अपयशी ठरले आहे. आता केंद्रातील खुर्ची वाचवण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतच आहे. राज्यातील मुस्लीम समाजाने ७२ टक्के भोंग्याचे आवाज कमी केले आहेत. काहींनी भोंगे काढले आहेत. राज्यातील भाईचारा संपू नये, यासाठी मुस्लीम समाज पुढाकार घेत असेल तर हे गौरवास्पद आहे.’

‘भाजपने पाच महिने एसटीचे आंदोलन तेवत ठेवले. जनतेला त्रास दिला. सदावर्तेंकडे नोटा मोजण्याची मशीन सापडली. ते कुठल्या नोटा मोजत होते, याची चौकशी होण्याची गरज आहे. एसटी कामगारांच्या मागण्या योग्य आहेत. सरकाने त्यांना न्याय द्यावा,’ अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा