शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

१६ एप्रिलपर्यंत नाना पटोले गुवाहाटीत असतील.., काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 11:52 AM

नाना पटोलेंना दर महिन्याला एक खोका मिळतो, असाही आरोप त्यांनी केलाय

नागपूर : गेल्याा काही काळापासून काँग्रेसमधील नेत्यांमध्ये या ना त्या कारणावरून धुसफूस सुरू असून सर्व काही आलबेल नसल्याच्या वार्ता सातत्याने येत असतात. यातच एका काँग्रेस नेत्याने नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित राहिल्यानंतर चर्चांना पुन्हा पेव फुटले असून आता १६ एप्रिलला नागपुरात होणाऱ्या सभेपर्यंत पटोले हे गुवाहाटीला पोहोचलेले असतील असा आरोप या नेत्याने केलाय.

राज्यात काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये आपआपसांत अनेक कारणांवरून निर्माण झालेल्या समज-गैरसमजामुळे सद्यपरिस्थिती काही बरी नसल्याचे दिसते. यातच काँग्रेसच्या एका नेत्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोलेंना दर महिन्याला एक खोका मिळतो, असा आरोप काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी केलाय. यासह,  १६ एप्रिलला पटोले गुवाहाटीत असतील, असंही देशमुख म्हणाले आहेत. नागपुरात एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी बोलताना देशमुख यांनी पटोलेंवर हे गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले देशमुख..

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला नाना पटोले गैरहजर होते. मात्र, त्यानंतर ते ठणठणीत असल्याचं वक्तव्य नुकतचं आलंय. त्यावरून आपण जी माहिती घेतली त्यात असं लक्षात आलं की, प्रदेशाध्यक्ष हे सुरतच्या मार्गावर होते आणि सुरतच्या मार्गावर कोण असतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. १६ तारखेला मविआची नागपुरात सभा आहे तोपर्यंत आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे गुवाहाटीपर्यंत पोहोचल्याचे आपल्याला पाहायला मिळेल, असं देशमुख म्हणाले. 

पुढे बोलताना देशमुख म्हणाले, ''संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की आशिष देशमुख जे बोलतो त्याच्या मागे जर वजन असेल तरच बोलतो. महिन्याच्या एक खोका नक्कीच त्यांना जात आहे. म्हणून आपल्या लक्षात येईल की या नवीन सरकारमधील जे प्रमुख आहे त्यांच्या विरोधामध्ये बोलताना आमचे प्रदेशाध्यक्ष कधीच दिसत नाहीत. पण उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात, भाजपच्या विरोधात सातत्याने बोलताना दिसतात. पण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ते बोलताना दिसत नसल्यामुळे यामागे तो खोका कारणीभूत आहे का? हा देखील प्रश्न आज पुष्कळशा लोकांना मुंबईच्या वर्तुळात पाहायला मिळतोय.'' 

नाना पटोले सुरतच्या मार्गावर?

नागपूर विभागातून आमचे प्रदेशाध्यक्ष येतात. नागपूर विभागाची महाविकास आघाडीची सभा येत्या १६ तारखेला येथे होत आहे. त्याची तीळमात्रही जबाबदारी त्यांनी घेतलेली नाहीये. संपूर्णत: जबाबदारी ही दुसऱ्या मोठ्या नेत्याकडे आहे. यावरून लक्षात घेता येईल की संभाजीनगरच्या सभेत सुरतच्या मार्गावर असलेले आमचे प्रांताध्यक्ष हे १६ तारखेच्या नागपुरच्या सभेपर्यंत गुवाहाटीला पोहोचलेले आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील असा आरोप देशमुख यांनी केलाय. 

सावरकर संदर्भात राहुल गांधींना सल्ला

सावरकर हे महान स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आहेत. त्यांच्याबद्दल वक्तव्य करून अनाठायी वाद काढण्यामध्ये कुठेतरी राहुल गांधी यांनी थांबलं पाहिजे. ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी वीरांनी जो लढा त्यांनी दिलाय त्यासाठी त्यांचा आदरच केला पाहिजे. यासंदर्भात शरद पवार यांनीही राहुल गांधी यांचे कान टोचले असून माझी अपेक्षा आहे की, यापुढे राहुल गांधी यांच्या तोंडून सावरकर यांच्याबद्दल काही अनुद्गार निघणार नाही, असं देशमुख म्हणाले. आता या आरोपांवर पटोले काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसAshish Deshmukhआशीष देशमुखNana Patoleनाना पटोले