शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

जिल्हा बँकेला नवसंजीवनी

By admin | Published: March 15, 2016 4:51 AM

केवळ शेतकऱ्यांना बँकेच्या विविध सवलतीचा फायदा व्हावा, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय

नागपूर : केवळ शेतकऱ्यांना बँकेच्या विविध सवलतीचा फायदा व्हावा, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे रिझर्व्ह बँकेने नागपूरच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपला कारभार सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.बँकेचे कार्यक्षेत्र नागपूर जिल्हा सोमवारी रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल करताना दोन अटी घालून दिल्या आहेत. या बँकेची कार्यकक्षा फक्त नागपूर जिल्हाच राहणार आहे. तसेच परवान्याची प्रत बँकेला प्राप्त झाल्यानंतर बँक आपले दैनंदिन काम सुरू करू शकेल.राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना बँकेत १५० कोटींचा घोटाळा झाला होता. त्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. प्रशासकाच्या काळातही घोटाळे झाल्यामुळे अनेकांनी गुंतवणूक केलेल्या रकमा बँकेकडे अडकल्या. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज थांबले. अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही थांबले होते. शेतकऱ्यांचे बरेच नुकसानही बँक बंद झाल्यामुळे झाले. १५ मार्चपर्यत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू करण्यात येईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी नागपूरच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या बँकेचा कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पुढाकार घेतला. अनेक बैठका झाल्यानंतर शासनाने बँकेला काही निधी देण्याची तयारी दर्शविली.कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज मिळणारबँकेचे आर्थिक व्यवहार सुरू होताच आॅक्टोबरनंतर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पूर्वी कर्जाचा भरणा केलेल्या वा आता करीत असलेल्यांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. मार्चच्या प्रारंभीपासूनच १०० कोटी, त्यानंतर ५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. बँक सुरू होताच एनपीए कमी होणार आहे. एक लाखापर्यंत शून्य टक्के आणि दोन लाखांपर्यंत दोन टक्के व्याजदराने कर्जवाटप होणार आहे. याशिवाय ठेवी परतची प्रक्रिया रिझर्व्ह बँकेचे नियम आणि अटींनुसारच होईल.(प्रतिनिधी)शासनाने आश्वासन पाळलेरिझर्व्ह बँकेने आता बँक चालविण्यासाठी परवाना दिल्यामुळे शेतकऱ्याच्या हक्काची बँक असलेल्या एनडीसीसी बँक पुन्हा जिवंत झाली आहे. नागपूर भागातील शेतकऱ्यांना आता बँकेच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. अनेकांना वेळोवेळी कर्जेही उपलब्ध होतील. शेतकऱ्यांसाठी ही बँक सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. शासनाने दिलेले आश्वासन नियोजित वेळेत पाळले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.