शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

प्रभाग रचनेविरोधात राष्ट्रवादी राजभवनावर पत्रांचा पाऊस पाडणार

By कमलेश वानखेडे | Updated: August 5, 2022 18:19 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली, निवडणुका त्वरीत घेण्याची मागणी

नागपूर : महापालिकेतील तीन सदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धती करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात जनमत उभे करण्याची तयार राष्ट्रवादी काँग्रेसने चालवली आहे. या निर्णयाविरोधात जनतेला सोबत घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नावे मुंबई राजभावनावर पत्रांचा पाऊस पाडण्याची घोषणा राष्ट्रवादीने केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी उपमहापौर शेखर सावरबंधे, रमण ठवकर, सतीश इटकेलवार, अफजल फारूक आदींनी पत्रकार परिषद घेत यासंबंधीची घोषणा केली. राज्यपालांनी व निवडणुक आयोगांनी या गंभीर विषयाची दखल घेण्याची मागणी केली. पेठे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मे तसेच जुलै महिण्यात दोन वेळा राज्य निवडणुक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका १५ दिवसात जाहीर करा असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार तिन सदस्यीय प्रभाग निहाय निवडणुकीची संपूर्ण ऑगस्टला ओ.बी.सी आरक्षणाचे राजपत्र प्रसिध्द होणार होते. तरी देखील दोन दिवसांपूर्वी फक्त दोन लोकांच्या कॅबीनेट ने चार सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणुक घेण्याचा तुघलकी फरमान काढले आणि त्यांच्या या निर्णयाने निवडणुका अनिश्चीत काळाकरीता पुढे ढकल्या गेल्या.

राज्य घटनेतील अनुच्छेद २४३-ई आणी २४३ -यु आणी महाराष्ट्र महापालिका कायदयातील कलम ४५२ अ(२) तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी संबंधित कायदयातील इतर तरतुदी नुसार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणुका विनाविलंब झाल्याच पाहीजे असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. ५ ऑगस्ट ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपत आहे. त्यामुळे लवकर निवडणुका घेणे बंधनकारक होते पण आमची पुन्हा सत्ता येणार नाही या भितीने सर्वोच्च न्यायालयाची आदेशाची पायमल्ली या सरकारने केली, असा आरोप पेठे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस