शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील काम सैरभैर; नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्येही मरगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 17:56 IST

राष्ट्रवादीची ज्योत जिल्ह्यात तेवत ठेवणारे माजी गृहमंत्री ईडीच्या घेऱ्यात अडकल्याने कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूकीत त्याचे परिणाम बघायला मिळाले आहे.

नागपूर : एकीकडे विदर्भातून राष्ट्रवादीत नेत्यांची इनकमिंग सुरू झाली आहे. माजी खासदार सुबोध मोहितेसह, आभा पांडे, रवनिश पांडेय, प्रशांत पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन पक्षाचे बळ वाढविले असताना, जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचे काम सैरभैर झाले असून जिल्हाध्यक्ष फक्त नावापुरतेच असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीची ज्योत जिल्ह्यात तेवत ठेवणारे माजी गृहमंत्री ईडीच्या घेऱ्यात अडकल्याने कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूकीत त्याचे परिणाम बघायला मिळाले आहे. आता राष्ट्रवादीचा जिल्हा परिषदेतील गटनेत्याची निवडीसाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही.

जिल्ह्यात काटोल व हिंगणा विधानसभेत राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. जिल्हा परिषदेवर या दोन्ही विधानसभेतून राष्ट्रवादीचे बहुतेक सदस्य निवडून येतात. या दोन्ही मतदार संघातून जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीने १० जागेवर मजल मारली आणि सत्तेतही वाटा मिळविला. पण ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने राष्ट्रवादीचे ४ सदस्य अपात्र ठरले.

राष्ट्रवादीच्या एका सदस्याने ऐन पोट निवडणूकीच्या तोंडावर पक्ष बदल केला. मात्र माजी मंत्री रमेश बंग यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावत उमेदवार बदलवूनही जागा आपल्या ताब्यात ठेवली. मात्र पोट निवडणुकीत राष्ट्रवादीला २ जागांचा फटका बसला. सदस्यत्व रद्द झाल्यामुळे राष्ट्रवादीचे गटनेतेही अपात्र ठरले. आता पोट निवडणुका पार पडल्यानंतर सत्ताधारी काँग्रेसने लगेच पक्षाची बैठक घेऊन गटनेत्याची निवड केली.

भाजपाने अजूनही गटनेता जाहीर केला नाही, मात्र बैठका, सदस्यांचे मनोगत जाणून घेतले. पण राष्ट्रवादीत गटनेत्यासंदर्भात कुठलीही चर्चा बैठका नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पिल्लर असलेले अनिल देशमुख पोट निवडणुकीच्या पूर्वीपासूनच वादात सापडले आहे. त्यांचा मुलगा व जि.प. सदस्य सलील देशमुख यांचेही जिल्ह्याकडे किंबहुना मतदार संघाकडे दूर्लक्ष झाले. उमेदवार ठरविण्यापासून ते निवडणुकीची रणनिती आखण्यापर्यंत माजी मंत्री रमेश बंग यांनी पुढाकार घेतला.

या पोट निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्याचा आधार घ्यावा लागला. हातातील एक जागा बंडखोरीमुळे राष्ट्रवादीला गमवावी लागली. जिल्हाध्यक्ष गुजर देखील पक्षाची मोट बांधायला अपयशी ठरले. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांचाही उत्साह हरविला आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेतील सदस्यांचा कुठला अजेंडा नाही. आपण सत्तेत आहो की विरोधात याबाबतही ते असंमजस आहे. आता उरलेल्या ८ सदस्यांना बांधून ठेवणारा गटनेताही नसल्याने सदस्यांनी जिल्हापरिषदेकडे पाठ दाखविली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर