शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आदिवासींच्या आरोग्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:11 IST

ग्रामीण व दुर्गम भागात आजही बहुसंख्य डॉक्टर सेवा देण्यास तयार नाहीत. आरोग्याचे शिक्षण देणाऱ्या आणि धोरणे ठरविणाऱ्या बहुतांश संस्था या शहरकेंद्रित झाल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागात आज सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती बिकट झाली आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण आणि जमिनीवरची वास्तविकता यात बरेच अंतर निर्माण झाले आहे. ही दरी दूर करायची असेल तर प्रात्यक्षिकावर आधारित वैद्यकीय शिक्षणावर भर दिल्याशिवाय ग्रामीण आरोग्याची बिघडलेली नाडी सुधारता येणे शक्य नाही. विशेषत: आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्थेची गरज आहे, असा सूर मेडिकलच्या सामाजिक वैद्यकशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रकट मुलाखतीतून उमटला.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये तज्ज्ञांचा सूर : सामाजिक वैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण व दुर्गम भागात आजही बहुसंख्य डॉक्टर सेवा देण्यास तयार नाहीत. आरोग्याचे शिक्षण देणाऱ्या आणि धोरणे ठरविणाऱ्या बहुतांश संस्था या शहरकेंद्रित झाल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागात आज सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती बिकट झाली आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण आणि जमिनीवरची वास्तविकता यात बरेच अंतर निर्माण झाले आहे. ही दरी दूर करायची असेल तर प्रात्यक्षिकावर आधारित वैद्यकीय शिक्षणावर भर दिल्याशिवाय ग्रामीण आरोग्याची बिघडलेली नाडी सुधारता येणे शक्य नाही. विशेषत: आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्थेची गरज आहे, असा सूर मेडिकलच्या सामाजिक वैद्यकशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रकट मुलाखतीतून उमटला.‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’निमित्त मेडिकलमध्ये ‘आदिवासींचे आरोग्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच याच विषयावर ‘सर्च’चे संस्थापक डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे, मेळघाट येथील महानचे डॉ. आशिष सातव यांची एकाच व्यासपीठावर संयुक्त मुलाखत ‘पीएसएम’ विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे यांनी घेतली. त्यावेळी हा सूर उमटला.कार्यक्रमाला वरिष्ठ विशेषज्ञ डॉ. बी.जी. सुभेदार, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. तेजस्विनी ठोसर, माजी अधिष्ठाता डॉ. एस. डब्ल्यू. कुळकर्णी, पीएचएफआयचे डॉ. संजय झोडपे उपस्थित होते. या कार्यक्रमात मेडिकलचे माजी अधिष्ठाता डॉ. डी. के. रामदवार यांच्या स्मृतिनिमित्त जनऔषधी विभागाच्या लेक्चर्स हॉलला त्यांचे नाव देण्यात आले. प्रास्ताविक ‘पीएसएम’ विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार यांनी केले. डॉ. कुळकर्णी यांनी डॉ. रामदवार यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.आरोग्याचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवावे लागतात - डॉ. कोल्हेडॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण आणि तळागाळातली आरोग्याची गुंतागुंत यात बरेच अंतर असते. ग्रामीण व दुर्गम भागातल्या आजाराला सामाजिक, भौगोलिक, आर्थिक, कौटुंबिकदेखील इतिहास चिकटलेला असतो. ‘इन्टर्नशीप’दरम्यान मेळघाट भागात काम करताना हे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे तेथील आरोग्याचे प्रश्नही स्थानिक परिस्थितीची सांगड घालूनच सोडवावे लागतात.आरोग्याच्या सोयीच पोहचायला उशीर-डॉ. सातवडॉ. आशिष सातव म्हणाले, कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूमुळे मेळघाट नेहमीच चर्चेत राहिले आहे. आजही मेळघाटात जन्माला येणाऱ्या दर हजार बालकांपैकी ६० बालके उपजत मृत्यूला कवटाळतात. कुपोषणाचा दर १४ टक्के तर तरुणांचा मृत्यूदर हजारी ४०० वर पोहचला आहे. याकडे आरोग्य धोरण ठरविणाऱ्यांचे लक्ष गेलेले नाही. सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के लोकसंख्या आदिवासी असली तरी यातील ९० टक्क्यांपर्यंत आरोग्याच्या सोयी पोहचत नाही, हे दाहक वास्तव आहे.तळागळात जाऊन प्रात्यक्षिकावर भर द्यायला हवा-डॉ. बंगडॉ. अभय बंग म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण आणि प्रत्यक्षातील ग्रामीण भागातील आव्हाने, यात बरेच अंतर असते. त्यामुळे आरोग्य शिक्षणाने वर्गाचा उंबरठा ओलांडून तळागळात जाऊन प्रात्यक्षिकावर भर द्यायला हवा.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdoctorडॉक्टर