शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

गरीब मुलाशी लग्न झाल्याने नवविवाहितेने स्वत:ला संपविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2022 7:46 PM

Nagpur News कुटुंबीयांनी गरीब घरात लग्न लावून दिल्याने एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.  

ठळक मुद्देडायरीतून झाला आत्महत्येचा उलगडा

नागपूर : कुटुंबीयांनी गरीब घरात लग्न लावून दिल्याने एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.  मंगळवारी (दि.१) जलालखेडा येथे अश्विनी रणमले (२५) या नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांना अश्विनीची डायरी मिळाली आहे. यात तिने लग्न झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अश्विनीचे हरिदास रणमले (रा. घानमुख ता. महागाव जि. यवतमाळ) याच्याशी २९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न झाले होते. हरिदास याला २०२० मध्ये शिक्षक म्हणून नोकरी लागली. त्याची नियुक्ती वाढोणा येथील जिल्हा परिषद शाळेत आहे. तीन वर्षापर्यंत शिक्षणसेवक असल्यामुळे त्याला ६ हजार मानधन मिळत आहे. लग्न झाल्यानंतर तो ७ जानेवारीपासून जलालखेडा येथे वास्तव्यास आहे. पती-पत्नी व पत्नीची आजी जलालखेडा येथे भाड्याने राहत होते. पती शाळेत गेल्यावर व आजी गावी गेल्यानंतर मंगळवारी दुपारी ३ वाजताना अश्विनीने गळफास लावून आत्महत्या केली होती.

अश्विनीचे वडील बाबूराव बरमटेके वनविभागात होते. तिची माहेरकडील परिस्थिती सधन होती. अश्विनीच्या घरातील सर्व सदस्य उच्चशिक्षित व नोकरीवर आहेत. बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव व ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह अश्विनी आणि हरिदासच्या खोलीची तपासणी केली. यात त्यांना अश्विनीची डायरी मिळाली. यात नमूद असलेल्या माहितीवरून अश्विनीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे.

काय लिहिले अश्विनीने..‘ज्या दिवशी माझे साक्षगंध झाले तो माझ्या जीवनातील काळा दिवस होता. माझे एका गरीब घरात लग्न करून देण्यात आले. माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यापेक्षा गरीब आहेत. त्यांचे लग्न श्रीमंत घरी व उच्चशिक्षित मुलाशी झाले आहे. परंतु माझा सर्व परिवार उच्चशिक्षित असून माझे लग्न अशा गरीब घरात करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यू