शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपूर विमानळावरून सकाळी १० ते ६ पर्यंत उड्डाण नाही !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 18, 2024 20:16 IST

- सहा महिने सुरू राहणार काम : एएआयने रिकार्पेटिंगसाठी मागितली वेळ

नागपूर: नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून किमान पुढील सहा महिने सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत विमानाचे उड्डाण होणार नाही वा विमान धावपट्टीवर उतरणार नाही. याची माहिती विमान कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यानुसार कंपन्यांनी उड्डाणांचे नवीन वेळापत्रक तयार केले आहे. ते मार्च अखेरपासून लागू झाले आहे. 

धावपट्टीचे रिकार्पेटिंग (देखभाल-दुरुस्ती) होणार असल्याने प्रवाशांना निश्चितच अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) नागपूर विमानतळाचे संचालन करणारी मिहान इंडिया लिमिटेड कंपनीकडे (एमआयएल) रिकार्पेटिंगकरिता वेळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याच्या आधारावर एएआयला वेळ उपलब्ध करून दिली. हे काम भारतीय विमानतळ प्राधिकरणाला करायचे आहे. एएआयने वेळ मागण्यासाठी पत्र दिले होते. मात्र, रिकार्पेटिंगसाठी कंत्राटदार नेमला नसून एएआयने वेळ मागितल्याचे समोर आले आहे. बहुधा त्यामुळेच ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत काम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पावसामुळे दोन महिने कोणतेही काम होणार नाही. पावसाळ्यात उड्डाणाचे नवीन वेळापत्रक रद्द होणार असले तरी प्रवाशांना दिवसा उड्डाणे मिळणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. 

नागपूरहून विविध ठिकाणांसाठी दररोज सरासरी ४० उड्डाणे होतात. यापैकी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाच ते सहा विमानांचे संचालन होते. आता प्रत्येकाचे वेळापत्रक बदलले आहे. धावपट्टीच्या रिकार्पेटिंगला बराच वेळ लागतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

विमानांची उड्डाणे कमी होणार नाहीतमिहान इंडिया लिमिटेडचे अधिकारी म्हणाले, रिकार्पेटिंगमुळे दुपारच्या वेळेतील विमानांना सकाळ आणि संध्याकाळची वेळ देण्यात आली आहे. या संदर्भात विमान कंपन्यांनीही पाऊले उचलेली आहेत. त्यामुळे नागपुरातून अन्य शहरात होणारी उड्डाणे कमी होणार नाहीत. एवढेच आहे की, लोकांना सकाळी १० च्या आधी आणि संध्याकाळी ६ नंतर प्रवास करावा लागेल.

टॅग्स :nagpurनागपूरAirportविमानतळ