शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

आरएसएसने कितीही प्रयत्न केले तरी राज्यात सत्ता परिवर्तन होणार

By कमलेश वानखेडे | Published: September 04, 2024 5:37 PM

विजय वडेट्टीवार यांचा दावा : २० ते २५ वर्ष भाजपचा मुख्यमंत्री नाही

कमलेश वानखेडे, नागपूरनागपूर : राज्यातील जनता भाजपला कंटाळली आहे. महाराष्ट्रातील राजकरण एकमेका विरोधात नव्हते. वैयक्तिक विरोधात बोलण्याचे काम महाराष्ट्रात झाले. बहुजन समाज भाजपला कंटाळला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही प्रयत्न केले तरी राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. पुढील २० ते २५ वर्ष तरी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आता उपमुख्यमंत्री अजित पवार आहे लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून प्रोजेक्ट होत आहेत. ही श्रेय वादाची लढाई आहे. निवडणुकीच्या तोंडावर आहेत. यांना बहिणीचे प्रेम ओळखून आहे. हा दृष्ट भाऊ आहे. हा रक्षण करू शकत नाही. दोन चार महिन्यात पैसे देऊन मत मिळतील या भ्रमात राहु नये, असा टोला त्यांनी लगावला.

आरटीओमधील बदल्यांवर वडेट्टीवार म्हणाले, सगळ्या बदल्या राजकीय पैशाच्या भरवश्यावर होत आहेत. बोली लावली जात आहे. अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. सत्ताधारी आमदार पोलिसांची गाडी साफ करून घेतो तर पोलिसांची मानसिकता काय शिल्लक राहिली असेल. लवकर सत्तेत या नाहीतर हे लोक महाराष्ट्र खड्ड्यात घालतील असे अनेक अधिकारी आम्हाला खाजगीत सांगत आहेत, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांची ताकद रावसाहेब दानवे यांना कळली. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे पक्ष फोडायचे. त्यात दुसऱ्यांदा साथ द्यायची. दुसऱ्यांची पाळी आली की त्यांचा पक्ष फोडायचा चिन्ह पळवायचे हे पाप जे करत आहे. त्याचे कर्म भोगावे लागतील, असा चिमटाही त्यांनी घेतला.

एसटीच्या संपकारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा शब्द दिला होता. सदावर्तेच्या माध्यमातून सामावून घेऊ म्हणाले होते. पण ते झाले नाही. काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. पडळकर जर एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असेल तर त्यांची भूमिका बदललेली आहे. त्यांच्या वाट्याचा वाटेकरी दुसरा झाल्याने ते परेशान झाले आहेत. पडळकर सध्या सरकारच्या विरोधी भूमिका मांडताना दिसून येत आहेत. सगळं आलबेल आहे असं म्हणता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर