शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

ज्याचे कुणी नाही, त्याचे आयएमए

By admin | Published: May 09, 2016 3:00 AM

खासगी डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेली इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ‘ज्याचे कुणी नाही,

नागपूर : खासगी डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेली इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ‘ज्याचे कुणी नाही, त्याचे आयएमए’ या संकल्पनेला घेऊन आता वाटचाल करणार आहे. शासकीय डॉक्टर जेथे पोहोचत नाहीत, तेथे ‘आयएमए’ने जाण्याची तयारी दर्शवली आहे. नैतिकता आणि पारदर्शकपणाने रुग्णांना सुरक्षित व उत्कृष्ट दर्जाची आरोग्यसेवा देणे हेच आमचे ध्येय आहे, असा विश्वास ‘आयएमए’चे राष्ट्रीय महासचिव पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांनी व्यक्त केला. ‘आयएमए’ नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा रविवारी सायंकाळी थाटात पार पडला. या सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. अजय काटे यांनी डॉ. अविनाश वासे यांच्याकडे अध्यक्षपदाची तर मावळते सचिव डॉ. सरिता उगेमुगे यांनी डॉ. अर्चना कोठारी यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवली.दरम्यान डॉ. अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाध साधला. ते म्हणाले, ‘आयएमए’चे देशात दोन लाख सहा हजार सदस्य आहेत. रुग्णाची काळजी घेणे प्रत्येक डॉक्टरांचे कर्तव्य आहे. नवीन डॉक्टरला पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आता आयएमएने पुढाकार घेतला आहे. गरीब रुग्णांना आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. (प्रतिनिधी)शासन काही निर्णय चुकीचे घेत आहेडॉ. अग्रवाल म्हणाले, डॉक्टरांजवळ जायचेच कशाला? आपण व्यायाम केल्यास, दररोज दोन कि.मी.पर्यंत चालल्यास, दोन मजली पायऱ्या चढल्यास तसेही आरोग्य सुदृढच राहील. प्रत्येकाने आनंदी व सुदृढ राहावे, असे ‘आयएमए’चे सांगणे आहे. प्रत्येक शहरात, देशात व जगात प्रत्येक आजारावर उपचार आहे. ‘आयएमए’ सरकारसोबत काम करण्यास तयार आहे. परंतु, शासन काही निर्णय चुकीचे घेत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डॉक्टरांची नव्हे, ‘हेल्दी’ वस्तूंची मागणी कराडॉक्टरांच्या संख्येला घेऊन नेहमीच ओरड होत असते. डॉक्टरांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी करण्यापेक्षा स्वत: निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. शासनाकडे व्यायाम करण्यासाठी उद्याने मागा, सायकली मागा, सुदृढ आरोग्यासाठी चांगल्या वस्तूंचा पुरवठा करण्याची मागणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सोयी न देता खेडेगावात कसा जाणार डॉक्टर दिल्लीमध्ये परिचारिकेचे वेतन ६० हजार रुपयांपासून सुरू होते. परंतु ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना केवळ २५ ते ३० हजार मिळतात. यातच शासन सोयीही उपलब्ध करून देत नाही. यामुळे डॉक्टर खेड्यापाड्यात आपली सेवा देण्यास टाळाटाळ करतात. शासनाने यावर विचार करून प्रभावी उपाययोजना अमलात आणणे आवश्यक आहे.