शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

राजनेता नव्हे, जनसहभागातून भारत बनेल विश्वगुरू : आनंद कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:35 IST

प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच भारत पुन्हा विश्वगुरू बनेल, असा विश्वास पटणा, बिहारचे ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसेवासदन संस्थेचा रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताचा इतिहास अतिशय संपन्न आहे. त्या इतिहासाचे अवलोकन केल्यास आपले भविष्य खूप उज्ज्वल आहे, असे जाणवेल. परंतु एखादा राजकारणी येऊन आपल्या देशाला महासत्ता बनवेल, हा विचार मनातून काढून टाका. एखादा नेता फारतर सहकार्य करेल पण प्रयत्न प्रत्येकालाच करायचे आहेत. प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच भारत पुन्हा विश्वगुरू बनेल, असा विश्वास पटणा, बिहारचे ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केला.सेवासदन शिक्षण संस्थेच्या ९३ व्या वर्धापन दिननिमित्त विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार समारोहाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. यावेळी आनंद कुमार बोलत होते. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून यंदा हा पुरस्कार श्री मंगल बहुउद्देशीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारा संचालित सावनेरच्या मूकबधिर निवासी शाळा या संस्थेला देण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी गोयल गंगा ग्रुपचे संचालक अतुल गोयल, आमदार नागो गाणार, सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव इंदूबाला मुकेवार, पुरस्कार समितीच्या कार्याध्यक्षा वासंती भागवत, पुरस्कारप्राप्त संस्थेचे संस्थापक नारायण समर्थ प्रामुख्याने उपस्थित होते.आनंद कुमार यांनी पुढे बोलताना, १०, २०, ३० वर्षात एक वेळ येईल जेव्हा भारत विश्वगुरू बनेल आणि युरोप, अमेरिकेचेही लोक नागपूरसह भारतात शिक्षण आणि येथील रुग्णालयात उपचारासाठी येतील. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. रमाबाई रानडे यांनी १०० वर्षापूर्वी शिक्षणाचे महत्त्व ओळखून महिलांच्या शिक्षणासाठी कार्य केले, म्हणून आज असंख्य महिला पुढे जात आहेत. सेवासदन किंवा पुरस्कार घेणाऱ्या श्री मंगल संस्थेसारख्या अनेक संस्था, असंख्य लोक समाजाच्या उत्थानासाठी कार्य करीत आहेत. अशा संस्थांना, लोकांना प्रोत्साहित करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. केवळ प्रोत्साहन देऊन होणार नाही तर स्वत: त्या कामात सहभागी व्हा. देशात आजही दलित, वंचित, मागासवर्गीय मुले, महिला शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर आहेत. अशा गरजवंतांसाठी वेळ काढून थोडे कार्य करा. प्रत्येक मुलांवर विश्वास ठेवा, त्यांच्यात डॉक्टर, वैज्ञानिक, नोबेल प्राप्त करण्याच्या संभावना आहेत. हे काम करताना अनेक अडचणी येतील, पण धैर्याने, संयमाने काम करीत राहिल्यास यश मिळेल व भारत महासत्ता होईल,असे आवाहन आनंद कुमार यांनी केले.यावेळी अतुल गोयल यांनी, रमाबाई रानडे यांच्या कार्याचे कौतुक केले. ज्या समाजात महिलांना सन्मान मिळतो, तो समाज आणि देश समृद्ध होतो. मात्र पुरुषप्रधान मानसिकतेचा देश महासत्ता बनू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षणाचे बाजारीकरण झालेल्या काळात आनंद कुमार यांच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे. मात्र आता शिक्षकांमध्ये नैतिकतेचा अभाव दिसून येत असल्याची खंत व्यक्त करीत या कामात साधनेचा भाव येईपर्यंत आपण महाशक्ती बनू शकत नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन गडकरी यांनी केले तर संचालन आशुतोष अडोणी यांनी केले.गडकरी दाम्पत्याचे कौतुकआनंद कुमार यांनी यावेळी देशभरात हायवेचे जाळे पसरविणारे नितीन गडकरी सर्वाधिक कार्यक्षम मंत्री असल्याची भावना व्यक्त केली. मात्र महिलांना सक्षम करण्यासाठी झटणाऱ्या कांचन गडकरी यांचे कार्य त्यांच्यापेक्षा महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. मराठी लोक बिहारी माणसांना पळवून लावतात, असे बोलले जाते पण नागपुरात माझे नेहमी प्रेमाने स्वागत झाले, त्यामुळे मला असे जाणवत नाही, असे बोलताच सभागृहात हंशा पिकला.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर