शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

नदी पात्रातील झोपडपट्टीधारकांना नोटीस

By admin | Published: May 15, 2016 2:47 AM

पावसाळ्यात पिवळी नदी व चांभार नाला परिसरातील वस्त्यांना पुराचे पाणी शिरण्याचा धोका असतो.

शहरातील १२१ ठिकाणे धोकादायक : ३८०० कुटुंबांना धोका नागपूर : पावसाळ्यात पिवळी नदी व चांभार नाला परिसरातील वस्त्यांना पुराचे पाणी शिरण्याचा धोका असतो. अनेकदा प्राणहानी होण्याचा धोका असतो. ही बाब विचारात घेता नदी व नाल्यातील गाळ काढण्यासोबतच नदीपात्रातील झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. महापालिकेच्या मंगळवारी व आशीनगर झोन कार्यालयांनी नदी पात्रातील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्याला सुरुवात केली आहे. महापालिके च्या आपत्ती निवारण विभागाने पावसाळ्यात पाणी शिरण्याची शक्यता असलेली नागपूर शहरातील १२१ ठिकाणे व वस्त्या धोकादायक ठरविल्या आहेत. अतिवृष्टी व पूर आल्यास या वस्त्यात पाणी शिरण्याचा धोका असतो. यामुळे ३८०० कुटुंंबांना धोका निर्माण होतो. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या वस्त्यांतील लोकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यात आले आहे. आपत्ती निवारणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नदी व नाल्यातील गाळ व कचरा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पिवळी नदी काठावर वा नदीपात्रात ४०० अतिक्रमणे आहेत. गंगानगर, गोदावरीनगर, सूरजनगर, पलोटीनगर आदींचा यात समावेश आहे. यातील ३०० झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)नियमाचे उल्लंघन करून बांधकामनियमानुसार नदी पात्रात ५०० मीटर परिसरात कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम करता येत नाही. परंतु शहरातील सर्वच नद्यांच्या काठावर अतिक्रमण करण्यात आले आहे. नियमाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. काही भागातील अतिक्रमण वर्षानुवर्षे असल्याने ते काढणे शक्य नाही. परंतु अलिकडील काही वर्षात वसलेल्या झोपड्या हटविण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पिवळी नदी पात्रात २२०० अतिक्र मणआशीनगर झानेच्या हद्दीतील पिवळी नदी पात्रात २२०० अतिक्र मण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना आठवडाभरात अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रामदासपेठ, काचीपुरा झोपडपट्टीचा भाग, धरमपेठ विद्यालयाच्या मागील भाग, तेलंगखेडी तलावाचा परिसर, शीलानगर, गवळीपुरा, पांढराबोडी, हजारी पहाड, गांधीनगर झोपडपट्टी, संजयनगर, शिवाजीनगर, आदर्शनगर, ताजनगर, वांजरा, वांजरी, नारी, झिंगाबाई टाकळी, सक्करदरा भागातील झोपडपट्ट्या, पोहरा नदी काठावरील वस्त्यांना पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका असतो.