लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील विमान प्रवाशांसाठी आठ राज्यांनी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक केला आहे; पण आता १ जूनपासून महाराष्ट्रात कुठेही विमानाने प्रवास करणाऱ्यांना राज्य शासनाने आरटीपीसीआर चाचणीत सवलत दिली आहे. यापूर्वी असलेली आरटीपीआर चाचणीची बंधने दूर झाल्याने महाराष्ट्रातील प्रवाशांना चाचणीविना राज्यात कुठेही विमान प्रवास करता येणार आहे; पण अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे. याशिवाय राज्यातील प्रवाशांना देशातील आठ राज्यांमध्ये जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक आहे.