शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

आता रेशनच्या मोफत धान्यासाठी करावे लागणार ‘ई-केवायसी’; ३० जूनपर्यंत मुदत

By मोरेश्वर मानापुरे | Published: June 19, 2024 8:32 PM

न करणाऱ्यांना धान्याला मुकावे लागणार

नागपूर : सरकारच्या नवीन नियमांतर्गत रेशन कार्डाद्वारे मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना ३० जूनपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. या तारखेपर्यंत केवायसी न केल्यास रेशन कार्डधारकांना धान्य मिळणार नाही.

मोफत धान्य वितरण संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न पुरवठा विभाग अलर्ट मोडवर आला आहे. सरकारची खाद्य सुरक्षा योजना पारदर्शकरित्या राबविण्यासाठी कार्डधारकांना जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांमध्ये जाऊन केवायसी करायची आहे. केवायसी न करणाऱ्यांचे नाव खाद्य सुरक्षा यादीतून वगळण्यात येणार आहे. केवायसीकरिता कार्डावर नमूद ग्राहकांना कागदपत्रे देण्याची गरज नाही. मात्र, या सर्वांना रेशन दुकानातील बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून केवायसी करायचे आहे. याद्वारे कार्डावरील संबंधित व्यक्तीचा मॅसेज शिधावाटप निरीक्षकाच्या लॉगइनवर येईल आणि तो त्यांच्यातर्फे अप्रूव्हल केला जाईल. अशा सोप्या पद्धतीने ग्राहकांना केवायसी करायचे आहे. काही कारणास्तव कार्डावरील एखादा ग्राहक जिल्हा वा राज्याबाहेर असल्यास त्याचे केवायसी कसे होणार, याबाबत स्पष्टता नाही.

आधार केंद्रात अपडेट करावे बायोमेट्रिककार्डावर नमूद ग्राहकाचे केवायसी अनेक प्रयत्नानंतरही अपडेट होत नसेल तर त्याला आधार केंद्रात जाऊन बायोमेट्रिक अपडेट करता येईल. अपडेट झाल्यानंतरच त्याचे केवायसी होईल. सध्या प्रत्येक रेशन दुकानात ग्राहकाच्या केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, रेशन दुकानात मोफत धान्य घेणाऱ्यांची गर्दी पाहता दुकानदाराने कार्डधारकांना २० जूननंतर केवायसी करण्याचा सल्ला दिला आहे. अनेकदा वयस्क आणि लहानांचे अंगठ्याचे ठसे जुळत नसल्यामुळे त्यांच्या केवायसी प्रक्रियेत समस्या उद्भवत आहे.

न्य वाटपातील घोटाळा बंद होणार, खऱ्यां लाभार्थींना मिळणार फायदागहू आणि अन्य धान्य वितरणात होणाऱ्या घोटाळ्याच्या तक्रारीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याच्या अन्न पुरवठा विभागाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाचे ई-केवायसी होईल आणि मोफत धान्यासाठी किती लोक पात्र आहेत, याची खरी आकडेवारी पुढे येईल. अपात्र लोकांचे नाव कार्डावरून काढून टाकण्यात येईल. याद्वारे मोफत धान्य घोटाळ्यावर नक्कीच नियंत्रण येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेशनकार्डवरून मृतकांची नावे वगळण्यात येणार !जिल्ह्यात अनेकांच्या रेशनकार्डावर मृतकांच्या नावाची नोंद आहे. किंवा मुलींची लग्ने झावली आहेत. मात्र नाव रेशनकार्डवर आहे. त्यामुळेच त्यांची खाद्यान्न सुरक्षा यादीत अजूनही नोंद आहे. कुटुंबीयही त्यांच्या नावावर मोफत धान्य उचलत आहेत. मात्र आता ई-केवायसी प्रक्रियेमुळे अशांची नावे खाद्यान्न सुरक्षा यादीतून वगळण्यात येणार आहे.