शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

आता नागपुरात हिवाळी नव्हे पावसाळी अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:11 IST

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. मात्र, यापुढे त्याऐवजी पावसाळी अधिवेशन नागपुरात होण्याचे संकेत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या मुद्यावर काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे संकेत : काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद

आॅनलाईन लोकमतनागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. मात्र, यापुढे त्याऐवजी पावसाळी अधिवेशन नागपुरात होण्याचे संकेत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या मुद्यावर काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी सध्यातरी नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याची माहिती गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली होती. हा धागा धरीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत या मुद्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपुरात हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन घ्यावे, असा कामकाज सल्लागार समितीमध्ये आपला प्रस्ताव आहे. बैठकीत त्यावर चर्चा होईल व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. जुलैमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस असतो. अनेक प्रश्न उद्भवतात. शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनानंंतर होणारे अधिवेशन नागपुरात झाले तर त्याचा विदर्भाला फायदाच होईल, असेही त्यांनी सांगितले. स्वत: मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव असल्यामुळे आता गुलाबी थंडीत नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन इतिहासजमा होऊन पावसाळी अधिवेशनात सरकार नागपुरात दाखल होईल, हे निश्चित मानले जात आहे.दरम्यान, नागपुरात जुलैमध्ये अधिवेशन घेण्यावरून काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये मतभेद दिसून आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिवेशन जुलैमध्ये घेण्यास काहीही हरकत नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पण होणारे अधिवेशन हे चार ते सहा आठवड्याचे व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेले उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशन जुलैमध्ये घेण्यास विरोध केला. जुलैमध्ये शेतकऱ्यांचा हंगाम असतो. पीक निघाले नसते. त्यामुळे शेतमालाला मिळणारे भाव, पिकांचे होणारे नुकसान याचा कुठलाही अंदाज आलेला नसतो. शेतकऱ्यांचे प्रश्न या काळात समोर आलेले नसतात, असेही त्यांनी सांगितले.हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून पळ काढण्याचा सरकारने मार्ग शोधला आहे. जुलैमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येत नाही. त्यामुळे जुलैचे अधिवेशन नागपुरात घेऊन शेतकऱ्यांना कुठलाही न्याय मिळणार नाही. आ. विजय वडेट्टीवारउपनेते, काँग्रेस

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७nagpurनागपूर