शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

उन्हाळी सुट्टयांमध्येही गोव्याकरिता केवळ एक विमान

By मोरेश्वर मानापुरे | Published: May 29, 2024 9:52 PM

- उड्डाणे वाढविण्याची ट्रॅव्हल्स एजन्सींची मागणी : प्रवासी त्रस्त

नागपूर : वाढत्या तापमानासोबतच नागपूरकरांचा पर्यटनाकडे ओढा वाढला आहे. थंड हवेच्या ठिकाणांसह पर्यटक गोव्याकडे मोठ्या संख्येने जात आहेत. नागपुरातून थेट गोव्याकडे जाण्यासाठी इंडिगो कंपनीचे केवळ एक विमान असल्यामुळे पर्यटकांची निराशा होत आहे. प्रवासी संख्या जास्त असल्यामुळे नागपुरातून थेट गोव्याकडे जाण्यासाठी आणखी विमाने सुरू करण्याची ट्रॅव्हल्स एजन्सींची मागणी आहे.

इंडिगोचे नागपूर-गोवा विमान रात्री ८.२० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट उड्डाण भरून रात्री ९.५५ वाजता गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचते. केवळ एकच थेट विमान असल्यामुळे कंपनी एका तिकिटाचे ७ ते १० हजार रुपयांपर्यंत भाडे आकारते. विमानांची संख्या वाढल्यास भाडे कमी होईल आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढेल, असा ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांना विश्वास आहे.

नागपुरातून दररोज २६ उड्डाणे १२ शहरांना जोडते. इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्या प्रवाशांना सेवा देते. नागपूरहून मुंबईकडे दररोज ५ विमाने जातात. दिल्लीकडे ५, पुणे, ३, हैदराबाद २, गोवा १, कोलकाता १, बेंगळुरू २, अहमदाबाद १, लखनऊ १, नाशिक १, इंदूर २, किसनगढ १ अशा विमानसेवा आहेत. तसेच बेळगावकरिता आठवड्यात सोमवार, मंगळवार, गुरुवार, रविवार अशी चार दिवस उड्डाणे आहेत. तसेच अजमेर जाणाऱ्यांसाठी किसनगढचे एक विमान असून ते आठवड्यात सोमवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशा चार दिवस सेवा आहेत.

कंपन्या अचानक वाढविते भाडेविमान कंपन्या प्रवाशांची संख्या वाढताच संबंधित विमानाचे भाडे अचानक वाढविते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच उन्हाळ्यात आवडत्या ठिकाणांवर विमानाने जाण्यासाठी पर्यटकांच्या खिशावर ताण येत आहे. विमानांची संख्या जास्त राहिल्यास प्रवाशांवर आर्थिक बोझा पडणार नाही. तसे पाहता नागपुरातून वाढत्या प्रवासी संख्येनुसार विमानांची संख्या फारच कमी असल्याचे ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांचे मत आहे. या कारणांमुळे भाडे वाढवून कंपन्या पर्यटकांचा खिशा रिक्त करीत आहे. नागपुरातून गोव्याकडे जाण्यासाठी केवळ एकच विमान असल्यामुळे पर्यटकांची निराशा होत आहे

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी