शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

..तर सरकार स्वामी विवेकानंद स्मारकाचे नियमितीकरण करेल

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 28, 2024 19:16 IST

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : निर्णय जलशास्त्रीय अभ्यासाच्या अहवालावर अवलंबून

राकेश घानोडेनागपूर : पुणे येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राने अंबाझरी तलावापुढील विकास प्रतिबंधित क्षेत्रात बांधण्यात आलेले स्वामी विवेकानंद स्मारक पुरासाठी कारणीभूत ठरणार नाही, असा अहवाल दिल्यास या स्मारकाचे नियमितीकरण करण्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज गोवडा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. त्यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

 

भविष्यामध्ये अंबाझरी तलावातील पाण्यामुळे नागरिकांना पुराचा फटका बसू नये, यासाठी विविध प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे आताच्या बदललेल्या परिस्थितीत स्वामी विवेकानंद स्मारक पुरासाठी कारणीभूत ठरू शकते का, याचा अभ्यास करण्यासाठी महानगरपालिकेने केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राची नियुक्ती केली आहे. केंद्राने अभ्यासाकरिता सात महिन्याचा वेळ मागितला आहे. त्यानंतर केंद्राने स्वामी विवेकानंद स्मारक पुरासाठी कारणीभूत ठरू शकते, असा अहवाल दिल्यास हे स्मारक तातडीने हटविले जाईल. अन्यथा राज्य सरकार स्मारकाचे नियमितीकरण करण्यावर निर्णय घेईल, असे डॉ. गोवडा यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच, केंद्राला जलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी आवश्यक मुदत देण्याची विनंती केली आहे.

 

सप्टेंबर-२०२३ मध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे अंबाझरी तलावाचे पाणी विविध वस्त्यांमध्ये शिरून हाहाकार माजला होता. परिणामी, रामगोपाल बाचुका व इतर पीडित नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून अंबाझरी तलाव व नाग नदी परिसरातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यात यावी, स्वामी विवेकानंद स्मारक हटविण्यात यावे इत्यादी मागण्या केल्या आहेत. न्यायालयाने गेल्या १४ जून रोजी राज्य सरकारला स्वामी विवेकानंद स्मारकाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टSwami Vivekanandaस्वामी विवेकानंदnagpurनागपूर