शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

नागपुरात ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:29 IST

गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात एकसाथ सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांची कल्पना : गुन्हेगारांवर जरब बसविण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात एकसाथ सुरुवात झाली आहे.२७ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर २०१८ असे सलग १५ दिवस प्रायोगिक तत्त्वावर ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ चालविले जाणार आहे. त्यानुसार, शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला रोज त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागणार आहे. ठाणेदाराने त्यांच्या सहकाऱ्यामार्फत किती गुन्हेगारांची तपासणी केली. त्यातील खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, लुटमार, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी, एटीएम, घरफोडी करणारे गुन्हेगार किती तपासले. त्यांच्याकडून किंवा दुसऱ्या नवीन गुन्हेगारांकडून किती शस्त्रे जप्त केली, त्यांच्यावर काय प्रतिबंधात्मक कारवाई केली, याचा अहवाल तयार करावा लागणार आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या कुठे राहत आहेत, ते काय करतात, त्याचीही माहिती रोजच्या रोज सर्व वरिष्ठांना सादर करावी लागणार आहे.ठाणेदारांनी केलेल्या कारवाईचा अहवाल डीसीपी, गुन्हे शाखेसह पोलीस नियंत्रण कक्षाला देणेही बंधनकारक आहे. ठाणेदारांनी तयार केलेल्या गुन्हेगार तपासणीच्या अहवालाची एसीपी, डीसीपींना त्यांच्या परिमंडळनिहाय शहानिशा करावी लागणार आहे.गुन्हेगारी नियंत्रणाची अपेक्षा‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ उपक्रमांतर्गत रोजच गुन्हेगार तपासले जातील. गुन्हेगारांवर पोलिसांकडून रोजच नजर ठेवली जाणार असल्यामुळे गुन्हेगारांवर जरब राहील. त्यांना उपद्रव करण्यास संधी मिळणार नाही. पोलिसांचा धाक वाढेल. अर्थात शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात यश येईल, अशी यामागे पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांची कल्पना आहे.यापूर्वीचे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी शहरातील गुन्हेगार त्यांच्या घरीच आहे की आणखी कुठे, ते शोधून काढण्यासाठी पोलिसांना रोज टास्क देणे सुरू केले होते. त्यानुसार, आज कोणता गुन्हेगार कुठे आहे, त्याची माहिती काढून त्याच्यासोबत सेल्फी काढायची आणि ती वरिष्ठांना पाठविण्याचे निर्देश प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलिसांना देण्यात आले होते. या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते, हे विशेष!

टॅग्स :Crimeगुन्हाNagpur Policeनागपूर पोलीस