शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

ऑपरेशन नन्हे फरिश्ते: घरून पळून गेलेल्या १०६४ अल्पवयीन मुलांची आरपीएफकडून घरवापसी

By नरेश डोंगरे | Published: April 08, 2024 3:16 PM

नागपूर विभागात १५४ मुले-मुली पुन्हा पोहोचली स्वत:च्या कुटुंबीयांमध्ये

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भविष्याचा विचार न करता लावून वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा आमिषामुळे घरून पळून जाणाऱ्या १०५४ अल्पवयीन मुलामुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्याची प्रशंसनीय कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) बजावली आहे.

पाहिजे तसे घरच्यांकडून मिळत नाही, घरातील मंडळी नेहमी टोकतात, नेहमी भांडणं होतात त्याला कंटाळून अनेक अल्पवयीन मुले घर सोडतात. काहींना महानगराची चमकदमक तर काहींना ग्लॅमरचे आकर्षण असल्याने घरून पळ काढतात. तर, काही जणांना फूस लावून आमिष दाखवून पळवून नेले जाते. अशी मुले रेल्वे स्थानकावर दिसताच त्यांना विश्वासात घेऊन आरपीएफकडून विचारपूस केली जाते. त्यांच्या समस्या जाणून घेतले जातात. त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांची चूक लक्षात आणून देत त्यांना त्यांच्या भूमीकेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पनाही दिली जाते. त्याचे अशा पद्दतीने मतपरिवर्तन करून त्या मुला-मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना बोलवून घेतले जाते आणि त्यांच्या स्वाधिन त्यांची मुले केली जातात. यासाठी आरपीएफकडून चाईल्ड लाईन या स्वयंसेवी संस्थेचीही मदत घेतली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला आरपीएफने 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' असे नाव दिले आहे.

हे ऑपरेशन राबविण्यासाठी आरपीएफच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. मध्य रेल्वेच्या आरपीएफने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षभराच्या कालावधीत ठिकठिकाणी ऑपरेशन नन्हे फरिश्ते राबवून १०६४ मुला-मुलींना त्यांच्या कुटुंबियांत पोहचविण्याची कामगिरी बजावली आहे.

विभागनिहाय कारवाईचा आलेख

'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात आरपीएफने सर्वाधिक ३१३ मुला-मुलींची सुटका केली. मुंबई विभागात आरपीएफने ३१२ मुला-मुलींची, पुणे विभागात २१०, नागपूर विभागात १५४ तर, सोलापूर विभागात ७५ मुला-मुलींची आरपीएफने सुखरूप घरवापसी केली.

टॅग्स :nagpurनागपूर